शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध हे खेदजनक: सुधीर गव्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 14:44 IST

नामविस्तारानंतर विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तन घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचेही डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : ज्यांचा शिक्षणाशी गंधही नव्हता, अशा व्यक्तींची नावे शिक्षण संस्थांना बिनबोभाटपणे देण्यात येत होती. त्या काळात जगभर नावाजलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध झाला. नुसता विरोधच नाही तर तब्बल १७ वर्षांच्या संघर्षानंतर नामविस्तार झाला. ही खेदाचीच बाब असल्याचे प्रतिपादन एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३०वा नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे यांचे ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. व्यासपीठावर कुलसचिव दिलीप भरड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. योगिता हाेके पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गव्हाणे म्हणाले, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा सामाजिक समतेच्या विजयाचे प्रतीक आहे. वास्तविक बाबासाहेब हे सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रणेते होते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. मराठवाड्यात पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यामुळे अनेक बहुजन समाजातील पिढ्या शिकू शकल्या. अशा महामानवाचे नाव मिळणे, हा एक प्रकारे विद्यापीठाचा गौरव आहे. नामविस्तारानंतर विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तन घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचेही डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संजय शिंदे यांनी आभार मानले.

सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन व्हावेअध्यक्षीय समोरापात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन केले पाहिजे. त्या काळात मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी बोलून दाखवली. त्यांचे नाव मिळाल्यामुळे विद्यापीठाचाच गौरव झाला असल्याचेही डॉ. गोसावी यांनी सांगितले. यावेळी नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद