शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध हे खेदजनक: सुधीर गव्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 14:44 IST

नामविस्तारानंतर विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तन घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचेही डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : ज्यांचा शिक्षणाशी गंधही नव्हता, अशा व्यक्तींची नावे शिक्षण संस्थांना बिनबोभाटपणे देण्यात येत होती. त्या काळात जगभर नावाजलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यास विरोध झाला. नुसता विरोधच नाही तर तब्बल १७ वर्षांच्या संघर्षानंतर नामविस्तार झाला. ही खेदाचीच बाब असल्याचे प्रतिपादन एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३०वा नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे यांचे ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. व्यासपीठावर कुलसचिव दिलीप भरड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. योगिता हाेके पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गव्हाणे म्हणाले, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा हा सामाजिक समतेच्या विजयाचे प्रतीक आहे. वास्तविक बाबासाहेब हे सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रणेते होते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. मराठवाड्यात पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यामुळे अनेक बहुजन समाजातील पिढ्या शिकू शकल्या. अशा महामानवाचे नाव मिळणे, हा एक प्रकारे विद्यापीठाचा गौरव आहे. नामविस्तारानंतर विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. विशेषतः सामाजिक परिवर्तन घडविण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचेही डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संजय शिंदे यांनी आभार मानले.

सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन व्हावेअध्यक्षीय समोरापात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सामाजिक नैतिकता, मुल्यांचे जतन केले पाहिजे. त्या काळात मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी बोलून दाखवली. त्यांचे नाव मिळाल्यामुळे विद्यापीठाचाच गौरव झाला असल्याचेही डॉ. गोसावी यांनी सांगितले. यावेळी नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद