शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 12:34 IST

मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत, त्यांना मोबाइल पासून दूर ठेवा

पैठण : पूर्वीच्या काळात काम जास्त असल्यामुळे महिला लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफूचा बोंड घशाला लावायच्या. त्यामुळे मुले झोपी जात होती. मात्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अफूची जागा मोबाइलने घेतली असून, मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत. मोबाइलला मुलांपासून दूर ठेवा, असे आवाहन समाजसेवक दीपक नागरगोजे यांनी शुक्रवारी येथे आयोजित बालसाहित्य संमेलनात केले.

पैठण येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता माहेश्वरी धर्मशाळा येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन समाजसेवक दीपक नागरगोजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत, मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले, डॉ. दादा गोरे, किरण सगर, पुंडलिक अतकरे, साहित्यिक बाबा भांड, मसापचे सचिव संतोष गव्हाणे, स्वागताध्यक्ष संतोष तांबे, डॉ. उर्मिला चाकूरकर, मसापचे अध्यक्ष अनिल देशमुख, शिक्षणाधिकारी श्रीराम केदार, प्रकाश लोखंडे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, सोमनाथ परदेशी, किशोर तावरे, चेअरमन राजेंद्र वाघमोडे, प्रा. संदीप काळे, प्राचार्य रामावत, भास्कर बडे, बालसाहित्यिक आयुब पठाण आदींची उपस्थिती होती. साहित्य संमेलनात परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते. येथे आलेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पुस्तकांची खरेदी केली. या संमेलनासाठी पैठण शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती.

बालसाहित्याच्या माध्यमातून मुलावर मूल्यसंस्कार घडतील : सावंतयावेळी मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सुरेश सावंत म्हणाले की, आजच्या बालगोपाळांच्या आयुष्यातील संवाद हरवला आहे. गोष्ट हरवली. कविता हरवली. हे सगळेच मान्य करतात; पण त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत. शाळा नावाच्या उद्यानाची वाळवंटाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. बालसाहित्याच्या माध्यमातून मुलांवर मूल्यसंस्कार घडतील; अन्यथा यंत्राच्या युगात मुले यंत्र बनतील. यासाठी खबरदारी घेऊन बालकांच्या हातात पुस्तक दिल्यास उत्तम मूल्यसंस्कार घडतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित जवळजवळ सर्वच घटकांमध्ये एक प्रकारची उदासीनता आलेली आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या जोडीने आमच्या मनात, मेंदूत आणि हृदयात निष्क्रियतेचा व्हायरस शिरला आहे. कोरोना कालखंडातील बंदीमुळे लक्षावधी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दोन अनमोल शैक्षणिक वर्षे वाया गेली आहेत. हे झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरणार, हा प्रश्न आहे. आजचे शिक्षण पोथीनिष्ठ बनले आहे. उपाययोजनेच्या पातळीवर त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही, अशी खंत यावेळी डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य