शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 12:34 IST

मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत, त्यांना मोबाइल पासून दूर ठेवा

पैठण : पूर्वीच्या काळात काम जास्त असल्यामुळे महिला लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफूचा बोंड घशाला लावायच्या. त्यामुळे मुले झोपी जात होती. मात्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अफूची जागा मोबाइलने घेतली असून, मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत. मोबाइलला मुलांपासून दूर ठेवा, असे आवाहन समाजसेवक दीपक नागरगोजे यांनी शुक्रवारी येथे आयोजित बालसाहित्य संमेलनात केले.

पैठण येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता माहेश्वरी धर्मशाळा येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन समाजसेवक दीपक नागरगोजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत, मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले, डॉ. दादा गोरे, किरण सगर, पुंडलिक अतकरे, साहित्यिक बाबा भांड, मसापचे सचिव संतोष गव्हाणे, स्वागताध्यक्ष संतोष तांबे, डॉ. उर्मिला चाकूरकर, मसापचे अध्यक्ष अनिल देशमुख, शिक्षणाधिकारी श्रीराम केदार, प्रकाश लोखंडे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, सोमनाथ परदेशी, किशोर तावरे, चेअरमन राजेंद्र वाघमोडे, प्रा. संदीप काळे, प्राचार्य रामावत, भास्कर बडे, बालसाहित्यिक आयुब पठाण आदींची उपस्थिती होती. साहित्य संमेलनात परिसरात मोठ्या प्रमाणावर विविध पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते. येथे आलेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पुस्तकांची खरेदी केली. या संमेलनासाठी पैठण शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती.

बालसाहित्याच्या माध्यमातून मुलावर मूल्यसंस्कार घडतील : सावंतयावेळी मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सुरेश सावंत म्हणाले की, आजच्या बालगोपाळांच्या आयुष्यातील संवाद हरवला आहे. गोष्ट हरवली. कविता हरवली. हे सगळेच मान्य करतात; पण त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत. शाळा नावाच्या उद्यानाची वाळवंटाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. बालसाहित्याच्या माध्यमातून मुलांवर मूल्यसंस्कार घडतील; अन्यथा यंत्राच्या युगात मुले यंत्र बनतील. यासाठी खबरदारी घेऊन बालकांच्या हातात पुस्तक दिल्यास उत्तम मूल्यसंस्कार घडतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित जवळजवळ सर्वच घटकांमध्ये एक प्रकारची उदासीनता आलेली आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या जोडीने आमच्या मनात, मेंदूत आणि हृदयात निष्क्रियतेचा व्हायरस शिरला आहे. कोरोना कालखंडातील बंदीमुळे लक्षावधी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दोन अनमोल शैक्षणिक वर्षे वाया गेली आहेत. हे झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरणार, हा प्रश्न आहे. आजचे शिक्षण पोथीनिष्ठ बनले आहे. उपाययोजनेच्या पातळीवर त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही, अशी खंत यावेळी डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य