शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनातील गाठ सोडविली तरच परमात्मा प्राप्ती शक्य

By admin | Updated: May 6, 2015 00:28 IST

जालना : कुणाहीबद्दल आपल्या मनात गाठ अर्थात आढी असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच धर्माचे फळही मिळत नाही,

जालना : कुणाहीबद्दल आपल्या मनात गाठ अर्थात आढी असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच धर्माचे फळही मिळत नाही, असा मौलिक सल्ला प.पू. मुनीश्री प्रसन्नासागरजी यांनी मंगळवारी बोलताना दिला.जालना शहरातील सदर बाजार भागातील श्रेयांसनाथ दिगंबर जैन मंदिरात सुरू असलेल्या प्रवचनमालेत मुनीश्री बोलत होते. यावेळी प.पू. पियुषसागरजी, प.पू. सयंमसागरजी यांची उपस्थिती होती. प.पू. प्रसन्नासागरजी पुढे म्हणाले की, श्वास घेण्याचे काम म्हणजे जीवन नाही. आपला कुणावर विश्वास नसेल तर आपले जीवन एखाद्या मुडद्याप्रमाणे आहे. जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा लागतो. मात्र, मरण्यासाठी यापैकी काहीच लागत नाही. सूर्योदय, दुपार, सूर्यास्त हे निसर्गाचे कालचक्र आहे. त्याचप्रमाणे मनुष्यासाठी जीवन-मरण हे कालचक्र आहे. त्यातून जावेच लागणार आहे. जीवनरूपी सूर्याचा अस्त केव्हा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दोन गोष्टी करा, त्या म्हणजे या संसारातील प्रत्येक जीवाबरोबर मैत्रीभाव ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे, या जीवनात आपला कोणीही शत्रू बनणार नाही, याची दक्षता घ्या. आपल्या मनात कुणाबद्दल आकस म्हणजे कॅन्सरच्या गाठीसारखा आहे. त्यामुळे गाठ असेल तर ती वेळीच मोकळी करून आनंदीदायी जीवन जगा, असा सल्ला प्रसन्नासागरजी यांनी दिला. प.पू. पियुषसागरजी म्हणाले की, मन विचलित असल्यास ईश्वरापर्यंत पोहोचता येणार नाही. एकाग्रता ही श्रद्धेच्या माध्यमेतून वाढविता येते. झोप हा छोटा मृत्यू आहे. तर मृत्यू ही मोठी झोप आहे. परमात्मा प्राप्तीसाठी पूजा आणि आराधनेच्या माध्यमातून एकाग्रता वाढवा. एकाग्रतेद्वारेच जीवनातील ध्येय गाठता येते, असे ते म्हणाले.प.पू. संयमसागरजी म्हणाले की, दिवस-रात्र हे कालचक्र ठराविक कार्य करण्यासाठी आहे. दिवसा इतरांवर उपकार, सेवा करण्यासाठी तर रात्र ही विश्रांतीसाठी आहे.दिनचर्याची सुरूवात देवाला नमस्कार, आई-वडिल आणि थोरांना वंदनेने करावी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)