शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मनातील गाठ सोडविली तरच परमात्मा प्राप्ती शक्य

By admin | Updated: May 6, 2015 00:28 IST

जालना : कुणाहीबद्दल आपल्या मनात गाठ अर्थात आढी असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच धर्माचे फळही मिळत नाही,

जालना : कुणाहीबद्दल आपल्या मनात गाठ अर्थात आढी असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच धर्माचे फळही मिळत नाही, असा मौलिक सल्ला प.पू. मुनीश्री प्रसन्नासागरजी यांनी मंगळवारी बोलताना दिला.जालना शहरातील सदर बाजार भागातील श्रेयांसनाथ दिगंबर जैन मंदिरात सुरू असलेल्या प्रवचनमालेत मुनीश्री बोलत होते. यावेळी प.पू. पियुषसागरजी, प.पू. सयंमसागरजी यांची उपस्थिती होती. प.पू. प्रसन्नासागरजी पुढे म्हणाले की, श्वास घेण्याचे काम म्हणजे जीवन नाही. आपला कुणावर विश्वास नसेल तर आपले जीवन एखाद्या मुडद्याप्रमाणे आहे. जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा लागतो. मात्र, मरण्यासाठी यापैकी काहीच लागत नाही. सूर्योदय, दुपार, सूर्यास्त हे निसर्गाचे कालचक्र आहे. त्याचप्रमाणे मनुष्यासाठी जीवन-मरण हे कालचक्र आहे. त्यातून जावेच लागणार आहे. जीवनरूपी सूर्याचा अस्त केव्हा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दोन गोष्टी करा, त्या म्हणजे या संसारातील प्रत्येक जीवाबरोबर मैत्रीभाव ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे, या जीवनात आपला कोणीही शत्रू बनणार नाही, याची दक्षता घ्या. आपल्या मनात कुणाबद्दल आकस म्हणजे कॅन्सरच्या गाठीसारखा आहे. त्यामुळे गाठ असेल तर ती वेळीच मोकळी करून आनंदीदायी जीवन जगा, असा सल्ला प्रसन्नासागरजी यांनी दिला. प.पू. पियुषसागरजी म्हणाले की, मन विचलित असल्यास ईश्वरापर्यंत पोहोचता येणार नाही. एकाग्रता ही श्रद्धेच्या माध्यमेतून वाढविता येते. झोप हा छोटा मृत्यू आहे. तर मृत्यू ही मोठी झोप आहे. परमात्मा प्राप्तीसाठी पूजा आणि आराधनेच्या माध्यमातून एकाग्रता वाढवा. एकाग्रतेद्वारेच जीवनातील ध्येय गाठता येते, असे ते म्हणाले.प.पू. संयमसागरजी म्हणाले की, दिवस-रात्र हे कालचक्र ठराविक कार्य करण्यासाठी आहे. दिवसा इतरांवर उपकार, सेवा करण्यासाठी तर रात्र ही विश्रांतीसाठी आहे.दिनचर्याची सुरूवात देवाला नमस्कार, आई-वडिल आणि थोरांना वंदनेने करावी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)