शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

प्रयोगिता प्रमाणपत्राचे केवळ पाच प्रस्ताव

By admin | Updated: December 20, 2015 23:34 IST

हिंगोली : आदिवासी विद्यावेतन योजनेतंर्गत २००९ ते ११ या शैक्षणिक वर्षांतील लाभ घेतलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे उपयोगिता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव अद्याप दाखल करण्यात आले नाहीत.

हिंगोली : आदिवासी विद्यावेतन योजनेतंर्गत २००९ ते ११ या शैक्षणिक वर्षांतील लाभ घेतलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे उपयोगिता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले नाहीत. याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना १ डिसेंबर रोजी कळविण्यात आले होते. सदर प्रस्तावाची प्रक्रिया आठ दिवसांत होणे अपेक्षित असल्याचे शिष्यवृत्ती विभागाकडून सांगण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शासनस्तरावर सुरू असलेल्या शिक्षण संचलनालय शिष्यवृत्ती विभाग, पुणे यांच्यामार्फत अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यावेतन योजना राबविली जाते. योजनेतंर्गत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ४० रूपये तर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० रूपये प्रमाणे विद्यावेतन दिल्या जाते. जिल्ह्यातील जि. प. च्या शाळांसह अनुदानित ९२ तर विनाअनुदानित ३३ शाळांतून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. परंतु विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभ व योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली किंवा नाही, याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयोगिता प्रमाणपत्राचा अहवाल जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्राप्त झालेले प्रस्ताव पुणे येथील शिष्यवृत्ती विभागाकडे वर्ग करणे बंधनकारक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना किती प्रमाणात योजनेचा लाभ मिळाला याची खातरजमा केल्या जाते. परंतु याबाबत शाळांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून तसेच माहिती सांगूनही केवळ पाच अहवाल जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे याकडे संबधित गटशिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सेनगाव तालुक्यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर हिंगोली तालुक्यातील ९० तर कळमनुरी येथील १३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)