शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रवासी वाढले तरच औरंगाबाद शहराला विमान ‘कनेक्टिव्हिटी’ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:01 IST

येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरणावर ११० कोटी रुपये खर्च करून ९ वर्षे होत आले असून, या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणे शक्य होण्यात प्रवासी संख्या वाढण्याचा अडथळा आहे. औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जगाच्या नकाशावर असले तरी पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण वाढत नाही, तर दुसरीकडे औद्योगिक गुंतवणुकीला मोठी भरारी मिळत नाही. त्यामुळे नॅशनल, इंटरनॅशनल एअर कनेक्टिव्हिटीपासून हे विमानतळ सध्या दूरच आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय विमाने उडणे शक्य : विदेशी पर्यटकांचे प्रमाणही झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरणावर ११० कोटी रुपये खर्च करून ९ वर्षे होत आले असून, या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणे शक्य होण्यात प्रवासी संख्या वाढण्याचा अडथळा आहे. औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जगाच्या नकाशावर असले तरी पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण वाढत नाही, तर दुसरीकडे औद्योगिक गुंतवणुकीला मोठी भरारी मिळत नाही. त्यामुळे नॅशनल, इंटरनॅशनल एअर कनेक्टिव्हिटीपासून हे विमानतळ सध्या दूरच आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद येथून विमानसेवा व्यापक करण्याच्या दृष्टीने विमानसेवा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत औरंगाबादच्या क्षमतांचे मार्के टिंग करण्यात आल्याने विमान कंपन्या आणि केंद्र शासन आंतरराष्ट्रीय विमानसेवा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.बुद्धिस्ट सर्किटमध्ये कोलंबो ते औरंगाबाद सुरू करण्यास श्रीलंका एअरवेजला काहीच अडचण नाही. बोधगया ते औरंगाबादमार्गे थायलंड ते क्वालालंपूर ते आॅस्ट्रेलिया कनेक्टिव्हिटी होईल. कमी खर्च व वेळेत ही सगळी कनेक्टिव्हिटी होईल. चेन्नई, बंगलोर, निमराणा, जयपूर, ढोलेरो हे आॅटो हब कनेक्ट करा, उत्तर दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशी विमान सेवेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात व्हावी, यावर बैठकीत चर्चा झाली.सध्या येथील विमानतळावर पूर्ण सुविधा आहेत. कार्गाेसंदर्भात तीन वर्षांपासून फॉलोअप सुरू आहे. कार्गाे टर्मिनलसाठी तीन दिवसांपूर्वी मशीन बसविण्यात आली आहे. कार्गाे सेवा लवकरच सुरू होईल.लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवारात्री पार्किंग येथे झाले तर त्याचे फायदे होतील. मुंबई, पुण्यानंतर येथे येताना औरंगाबादचे प्रवासी मिळतील. येथून जाताना लवकर विमान मिळेल. शेतकऱ्यांची मागणी होती, उडाण योजनेमध्ये औरंगाबाद सहभागी करून घ्या. तीन विमानांपेक्षा जास्त विमाने असतील तर तेथे उडाण योजना देता येत नाही.आंतरराष्ट्रीय विमाने लवकरच सुरू होतील. कारण केंद्र शासनाने उड्डाण होताना जो तोटा होईल, त्याचे अनुदान देण्याबाबत तरतूद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमाने येथून जाण्याची शक्यता आहे. टीअर टू सिटीजमध्ये औरंगाबाद हा चांगला पर्याय आहे. आयकॉनिक स्ट्रक्चर म्हणून अजिंठा-वेरूळ लेण्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शासन आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत स्वत:च घोषणा करणे शक्य होईल, असे सीएमआयए अध्यक्ष भोगले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयtourismपर्यटन