शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रवासी वाढले तरच औरंगाबाद शहराला विमान ‘कनेक्टिव्हिटी’ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:01 IST

येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरणावर ११० कोटी रुपये खर्च करून ९ वर्षे होत आले असून, या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणे शक्य होण्यात प्रवासी संख्या वाढण्याचा अडथळा आहे. औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जगाच्या नकाशावर असले तरी पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण वाढत नाही, तर दुसरीकडे औद्योगिक गुंतवणुकीला मोठी भरारी मिळत नाही. त्यामुळे नॅशनल, इंटरनॅशनल एअर कनेक्टिव्हिटीपासून हे विमानतळ सध्या दूरच आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय विमाने उडणे शक्य : विदेशी पर्यटकांचे प्रमाणही झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरणावर ११० कोटी रुपये खर्च करून ९ वर्षे होत आले असून, या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणे शक्य होण्यात प्रवासी संख्या वाढण्याचा अडथळा आहे. औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जगाच्या नकाशावर असले तरी पर्यटकांच्या संख्येचे प्रमाण वाढत नाही, तर दुसरीकडे औद्योगिक गुंतवणुकीला मोठी भरारी मिळत नाही. त्यामुळे नॅशनल, इंटरनॅशनल एअर कनेक्टिव्हिटीपासून हे विमानतळ सध्या दूरच आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद येथून विमानसेवा व्यापक करण्याच्या दृष्टीने विमानसेवा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत औरंगाबादच्या क्षमतांचे मार्के टिंग करण्यात आल्याने विमान कंपन्या आणि केंद्र शासन आंतरराष्ट्रीय विमानसेवा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.बुद्धिस्ट सर्किटमध्ये कोलंबो ते औरंगाबाद सुरू करण्यास श्रीलंका एअरवेजला काहीच अडचण नाही. बोधगया ते औरंगाबादमार्गे थायलंड ते क्वालालंपूर ते आॅस्ट्रेलिया कनेक्टिव्हिटी होईल. कमी खर्च व वेळेत ही सगळी कनेक्टिव्हिटी होईल. चेन्नई, बंगलोर, निमराणा, जयपूर, ढोलेरो हे आॅटो हब कनेक्ट करा, उत्तर दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशी विमान सेवेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात व्हावी, यावर बैठकीत चर्चा झाली.सध्या येथील विमानतळावर पूर्ण सुविधा आहेत. कार्गाेसंदर्भात तीन वर्षांपासून फॉलोअप सुरू आहे. कार्गाे टर्मिनलसाठी तीन दिवसांपूर्वी मशीन बसविण्यात आली आहे. कार्गाे सेवा लवकरच सुरू होईल.लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवारात्री पार्किंग येथे झाले तर त्याचे फायदे होतील. मुंबई, पुण्यानंतर येथे येताना औरंगाबादचे प्रवासी मिळतील. येथून जाताना लवकर विमान मिळेल. शेतकऱ्यांची मागणी होती, उडाण योजनेमध्ये औरंगाबाद सहभागी करून घ्या. तीन विमानांपेक्षा जास्त विमाने असतील तर तेथे उडाण योजना देता येत नाही.आंतरराष्ट्रीय विमाने लवकरच सुरू होतील. कारण केंद्र शासनाने उड्डाण होताना जो तोटा होईल, त्याचे अनुदान देण्याबाबत तरतूद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमाने येथून जाण्याची शक्यता आहे. टीअर टू सिटीजमध्ये औरंगाबाद हा चांगला पर्याय आहे. आयकॉनिक स्ट्रक्चर म्हणून अजिंठा-वेरूळ लेण्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शासन आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत स्वत:च घोषणा करणे शक्य होईल, असे सीएमआयए अध्यक्ष भोगले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयtourismपर्यटन