शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

औरंगाबाद जिल्ह्यात रबीची 50.67 टक्केच पेरणी; ज्वारीपेक्षा गहू, हरभऱ्याचा वाढला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:14 IST

सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे.

ठळक मुद्दे औरंगाबाद, जालना आणि बीड तीन जिल्ह्यांत ८१. ५७ टक्के पेरणी 

औरंगाबाद : कृषी संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात रबीची ८१.५७ टक्के पेरणी, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ५०.६७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कडधान्याचा पेरा सरासरीपेक्षा वाढला असून,   गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची उपलब्धता अधिक असल्याने रबी ज्वारीचा पेरा घटून हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. 

तीन जिल्ह्यांत सरासरी १ लाख ६९ हजार ६६६ पैकी १ लाख ८४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर १०८.७७ टक्के कडधान्याची पेरणी झाली आहे. सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे. बीडमधील तब्बल १३५.९३ टक्के हरभऱ्यासह अन्य कडधान्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात कडधान्याचे सरासरी ८१ हजार १५४ हेक्टर क्षेत्र असून, १ लाख १० हजार ३११ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. जालना जिल्ह्यात सरासरी ४२ हजार ५६८ हेक्टर असूून, पैकी ४८ हजार ६०७ हेक्टरवर म्हणजे ११४.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४५ हजार ९४४ हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ६३५ हेक्टरवर हरभरा आदी कडधान्याची ५५.८० टक्के पेरणी झाली आहे. थंडी वाढल्याने रबीच्या उर्वरित क्षेत्रावरही गहू आणि हरभरा पेरणी पुढील काही दिवसांत  होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

प्रत्यक्ष पेरणी आणि आकडेवारीत तफावतऔरंगाबाद जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत केवळ ५०.६७ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. प्रत्यक्षात पेरणी ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या पाहणीतच विरोधाभासी चित्र दिसून आले आहे. त्यामुळे विभागाला आकडेवारी पुरवणारी यंत्रणा योग्य आकडेवारी पुरवण्यात दिरंगाई करतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  बीड व जालना जिल्ह्यातून आकडेवारी सद्य:स्थितीनुरूप जुळून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद