शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बॅकवॉटर क्षेत्रात फक्त ४ तास वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:28 IST

पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना दिवसातून अवघा चार तासांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात अवघा २१.८५ टक्के दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, भविष्यात निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना दिवसातून अवघा चार तासांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता (ग्रामीण) संजय आकोडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तीन दिवसांपासून पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना चार तास विद्युत पुरवठा केला जात आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांकडून अवैधरीत्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात जलसंपदा विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांच्या संयुक्त पथकामार्फत अवैधरीत्या पाणी उपसा करणाºया शेतकºयांची वीज जोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात पाणी उपसा कमी झाला होता.

सध्या जायकवाडी जलाशयात २१.८५ टक्के दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नवीन पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत हा पाणीसाठा सांभाळून ठेवण्याची गरज आहे. यासाठी बॅक वॉटर क्षेत्रातील अधिकृत व अनधिकृत पाणी उपसा करणारांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जलसंपदा विभाग व महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहेत. यावर उपाय म्हणून जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रात भारनियमन करून त्याठिकाणी कृषिपंपांसाठी दररोज अवघे चार तासच वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद