शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

बॅकवॉटर क्षेत्रात फक्त ४ तास वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:28 IST

पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना दिवसातून अवघा चार तासांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात अवघा २१.८५ टक्के दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, भविष्यात निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना दिवसातून अवघा चार तासांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता (ग्रामीण) संजय आकोडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तीन दिवसांपासून पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना चार तास विद्युत पुरवठा केला जात आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांकडून अवैधरीत्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात जलसंपदा विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांच्या संयुक्त पथकामार्फत अवैधरीत्या पाणी उपसा करणाºया शेतकºयांची वीज जोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात पाणी उपसा कमी झाला होता.

सध्या जायकवाडी जलाशयात २१.८५ टक्के दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नवीन पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत हा पाणीसाठा सांभाळून ठेवण्याची गरज आहे. यासाठी बॅक वॉटर क्षेत्रातील अधिकृत व अनधिकृत पाणी उपसा करणारांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जलसंपदा विभाग व महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहेत. यावर उपाय म्हणून जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रात भारनियमन करून त्याठिकाणी कृषिपंपांसाठी दररोज अवघे चार तासच वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद