शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या २३ हजार अर्जांचीच नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:58 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार पैकी फक्त २९ हजार शेतकºयांनी महा-ई-सेवा केंद्रांमध्ये नोंदणी केली असून, त्यातील २३ हजार १२४ शेतकºयांचेच अर्ज आॅनलाईन नोंदविले गेले आहेत़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार पैकी फक्त २९ हजार शेतकºयांनी महा-ई-सेवा केंद्रांमध्ये नोंदणी केली असून, त्यातील २३ हजार १२४ शेतकºयांचेच अर्ज आॅनलाईन नोंदविले गेले आहेत़२०१२ पासून जिल्ह्यातील शेतकºयांना कमी-अधिक प्रमाणात नैसर्गीक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने त्यांची सातत्याने आर्थिक कोंडी होत आहे़ २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकºयांना प्रत्येक वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पेरणी करण्यासाठी कर्ज घेण्याकरीता बँकेच्या रांगेत उभे रहावे लागते़ बँकांनी पीक कर्ज दिल्यानंतरच शेतकºयांची पेरणी सुरू होते; परंतु, या पाच वर्षांत शेतकºयांनी बँकेतून घेतलेले पीक कर्ज नैसर्गीक आपत्तीमुळे फेडणे शक्य झाले नाही़ परिणामी जिल्ह्यातील शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले़ त्यामुळे शेतकºयांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला़ या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २८ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकºयांना काही निकषाच्या आधीन राहून प्रती शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली; परंतु, या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे बंधनकारक केले़ त्या अनुषंगाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील ९५ महा-ई-सेवा केंद्र, ३६३ आपले सरकार, २८० सीएससी केंद्र यावर २४ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे़ यासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंर्गत २ लाख ८१ हजार शेतकरी या कर्जमाफीस पात्र ठरले आहेत़ यापैकी केवळ २९ हजार शेतकºयांनी या योजनेंतर्गत अर्जासाठी नोंदणी केली आहे़नोंद केलेल्यांपैकी केवळ २३ हजार १२४ शेतकºयांचे अर्ज या योजनेंतर्गत अपलोड झाले आहेत़ त्यामुळे केवळ २० दिवसांत तब्बल २ लाख ५७ हजार ८७६ शेतकºयांचे अर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अपलोड करून घेण्याचे खडतर आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे़ जिल्ह्यातील शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची खडतर प्रक्रिया प्रशासनाला कमी कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे़