शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
3
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
4
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
5
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
6
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
7
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
9
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
10
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
12
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
13
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
14
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
15
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
16
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
17
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
18
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
19
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी केवळ २२ वाळू पट्ट्यांचीच लिलाव प्रक्रिया होणे शक्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:58 IST

जिल्ह्यातील वाळूपट्टे लिलावाच्या प्रक्रियेला पुढच्या महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाळूपट्टे लिलावाच्या प्रक्रियेला पुढच्या महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. यावर्षीचा हंगाम १ आॅक्टोबरपासून सुरू होत असून, लिलाव प्रक्रियेत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील ३२ पैकी २२ वाळूपट्टे लिलाव प्रक्रियेत योग्य ठरविले आहेत. गोदापात्रात पाणी असल्यामुळे १० पट्टे लिलावात घेण्यात आलेले नाहीत. 

३० सप्टेंबर रोजी यावर्षीचा वाळूपट्टे लिलावाचा हंगाम संपतो आहे. ३२ पैकी केवळ दोन पट्टे मागील वर्षात लिलावात गेले. त्यामुळे महसुलाला फटका बसला. आॅक्टोबर महिन्यात २२ वाळूपट्ट्यांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात होईल. वाळूपट्ट्यांच्या किमान किमतीचा प्रस्ताव (आॅफसेट प्राईज) विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. जून-जुलै महिन्यात भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर २२ पट्ट्यांतून वाळू उपसणे योग्य राहणार आहे.

गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी असल्यामुळे १० पट्ट्यांतून वाळू उपसा करता येणार नाही. त्यामुळे सर्वेक्षणानुसार पैठण तालुक्यातील एकाही पट्ट्याचा पहिल्या टप्प्यातील लिलावात समावेश राहणार नाही. वाळूपट्टा लिलाव प्रक्रियेमध्ये वैजापूर तालुक्यातील ६, गंगापूर, कन्नड व फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी ३, तर सिल्लोड तालुक्यातील ७ पट्ट्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्याला गौण खनिजातून ७२ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. १० वाळूपट्टे लिलाव प्रक्रियेत येणार नाहीत. त्यामुळे महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार योग्य ठरलेल्या २२ वाळूपट्ट्यांमधून प्रशासनाला चार ते साडेचार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. 

आॅक्टोबरमध्ये होणार सर्वेक्षणगेल्या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्याला गौणखनिजातून ६० कोटी रुपये महसूल मिळण्याचे उद्दिष्ट होते. यात वाळूपट्ट्यांतून ४० कोटींच्या उत्पन्नाचा वाटा आहे. मात्र, दोन पट्ट्यांतूनच सरकारला महसूल मिळाला. यावर्षी तर वाळूपट्ट्यांची संख्या कमी झाली आहे; परंतु भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून आॅक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे, त्यानंतर वाळूपट्ट्यांत भर पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद