शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील धरणांत फक्त १५ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:30 IST

मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे

औरंगाबाद : मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे. तर ८५० च्या आसपास टॅँकरने विभागातील ६५० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. १५ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंंबून आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक भीषण पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील सुमारे १० लाख नागरिकांना ६०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१५ नंतर यावर्षीचा उन्हाळा ग्रामीण औरंगाबादला गांजतो आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे २ लाख तर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्व मिळून ३ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. एकूण सर्व मिळून ८६७ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे जलप्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवनदेखील होत आहे. त्यामुळे विभागात टँकरच्या पाणीपुरवठ्यावर ग्रामीण भाग अवलंबून आहे. यंदा पाऊस लांबल्यास ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना अधिक भटकंती करावी लागेल.

औरंगाबाद सर्वाधिक तहानलेलेऔरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस  झाला नाही. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांत १०० च्या आसपास टँकर सुरू आहेत. फुलंब्री तालुक्यात १००, पैठण ५०, गंगापूर १२०, वैजापूर ८२, खुलताबाद २३, कन्नड ३०, सिल्लोड, सोयगावमध्ये १०० टँकरने पाणीपुरवठा आहे. औरंगाबाद शहरालगतच्या दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, एमआयडीसीच्या जलकुंभांवरून ते पाणी घेतले जात आहे. पूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून, जिल्हा प्रशासनाला जूनअखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

एमआयडीसीवर भार शहर व लगतच्या गावांना टँकरने पिण्याचे पाणी दिले जात असून, ते पाणी एमआयडीसीच्या चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभांवरून दिले जात आहे. परिणामी औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. एमआयडीसीवर ६ एमएलडी पाणीपुरवठ्याचा भार पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला कसरत करावी लागते आहे.

विभागातील प्रकल्पांची स्थिती :प्रकल्प                 संख्या     पाण्याची टक्केवारीमोठे प्रकल्प            ११     १७ टक्केमध्यम प्रकल्प       ७५    १४ टक्केलघु प्रकल्प           ७४६    ७ टक्केगोदावरी बंधारे        ११    १८ टक्केइतर बंधारे             २४    १२ टक्केएकूण                  ८६७    १५ टक्के     

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरण