शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील धरणांत फक्त १५ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:30 IST

मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे

औरंगाबाद : मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे. तर ८५० च्या आसपास टॅँकरने विभागातील ६५० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. १५ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंंबून आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक भीषण पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील सुमारे १० लाख नागरिकांना ६०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१५ नंतर यावर्षीचा उन्हाळा ग्रामीण औरंगाबादला गांजतो आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे २ लाख तर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्व मिळून ३ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. एकूण सर्व मिळून ८६७ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे जलप्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवनदेखील होत आहे. त्यामुळे विभागात टँकरच्या पाणीपुरवठ्यावर ग्रामीण भाग अवलंबून आहे. यंदा पाऊस लांबल्यास ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना अधिक भटकंती करावी लागेल.

औरंगाबाद सर्वाधिक तहानलेलेऔरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस  झाला नाही. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांत १०० च्या आसपास टँकर सुरू आहेत. फुलंब्री तालुक्यात १००, पैठण ५०, गंगापूर १२०, वैजापूर ८२, खुलताबाद २३, कन्नड ३०, सिल्लोड, सोयगावमध्ये १०० टँकरने पाणीपुरवठा आहे. औरंगाबाद शहरालगतच्या दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, एमआयडीसीच्या जलकुंभांवरून ते पाणी घेतले जात आहे. पूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून, जिल्हा प्रशासनाला जूनअखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

एमआयडीसीवर भार शहर व लगतच्या गावांना टँकरने पिण्याचे पाणी दिले जात असून, ते पाणी एमआयडीसीच्या चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभांवरून दिले जात आहे. परिणामी औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. एमआयडीसीवर ६ एमएलडी पाणीपुरवठ्याचा भार पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला कसरत करावी लागते आहे.

विभागातील प्रकल्पांची स्थिती :प्रकल्प                 संख्या     पाण्याची टक्केवारीमोठे प्रकल्प            ११     १७ टक्केमध्यम प्रकल्प       ७५    १४ टक्केलघु प्रकल्प           ७४६    ७ टक्केगोदावरी बंधारे        ११    १८ टक्केइतर बंधारे             २४    १२ टक्केएकूण                  ८६७    १५ टक्के     

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरण