शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

मराठवाड्यातील धरणांत फक्त १५ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:30 IST

मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे

औरंगाबाद : मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे. तर ८५० च्या आसपास टॅँकरने विभागातील ६५० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. १५ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंंबून आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक भीषण पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील सुमारे १० लाख नागरिकांना ६०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१५ नंतर यावर्षीचा उन्हाळा ग्रामीण औरंगाबादला गांजतो आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे २ लाख तर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्व मिळून ३ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. एकूण सर्व मिळून ८६७ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे जलप्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवनदेखील होत आहे. त्यामुळे विभागात टँकरच्या पाणीपुरवठ्यावर ग्रामीण भाग अवलंबून आहे. यंदा पाऊस लांबल्यास ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना अधिक भटकंती करावी लागेल.

औरंगाबाद सर्वाधिक तहानलेलेऔरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस  झाला नाही. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांत १०० च्या आसपास टँकर सुरू आहेत. फुलंब्री तालुक्यात १००, पैठण ५०, गंगापूर १२०, वैजापूर ८२, खुलताबाद २३, कन्नड ३०, सिल्लोड, सोयगावमध्ये १०० टँकरने पाणीपुरवठा आहे. औरंगाबाद शहरालगतच्या दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, एमआयडीसीच्या जलकुंभांवरून ते पाणी घेतले जात आहे. पूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून, जिल्हा प्रशासनाला जूनअखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

एमआयडीसीवर भार शहर व लगतच्या गावांना टँकरने पिण्याचे पाणी दिले जात असून, ते पाणी एमआयडीसीच्या चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभांवरून दिले जात आहे. परिणामी औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. एमआयडीसीवर ६ एमएलडी पाणीपुरवठ्याचा भार पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला कसरत करावी लागते आहे.

विभागातील प्रकल्पांची स्थिती :प्रकल्प                 संख्या     पाण्याची टक्केवारीमोठे प्रकल्प            ११     १७ टक्केमध्यम प्रकल्प       ७५    १४ टक्केलघु प्रकल्प           ७४६    ७ टक्केगोदावरी बंधारे        ११    १८ टक्केइतर बंधारे             २४    १२ टक्केएकूण                  ८६७    १५ टक्के     

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरण