शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पाण्याच्या ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा

By admin | Updated: October 29, 2016 00:52 IST

औरंगाबाद : हडको भागातील नागरिकांना ठरवून दिल्यानुसार ४५ मिनिटे पाणी कधीच मिळत नाही व पाणी आल्यास ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा असते.

औरंगाबाद : हडको भागातील नागरिकांना ठरवून दिल्यानुसार ४५ मिनिटे पाणी कधीच मिळत नाही व पाणी आल्यास ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा असते. ही गंभीर बाब असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या औरंगाबाद मध्यच्या संघटक संगीता कृष्णा बोरसे व उपविभाग संघटक वंदना रमेश इधाटे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. त्यात त्या म्हणतात, हडको भागातील महिलांची एक बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यात मनपातर्फे ठरवून दिलेल्या वेळेत नळाला पाणी येत नाही व १५ मिनिटे तर नुसती हवा असते. काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी येणार नाही ंिकंवा केव्हा येणार हा मेसेजही मनपा कार्यालयाकडून मिळत नाही, मनपाने जनता दरबारमध्ये जनतेच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात, असा आग्रहही बोरसे- इधाटे यांनी धरला आहे. . गजानननगर येथील सरला कासलीवाल, छाया पैठणपगारे व बी. एस. म्हस्के यांच्या घरासमोरील विद्युत तारेवरच्या फांद्या तोडण्यात याव्यात अन्यथा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते, याकडेही मनपा उद्यान अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे मनपा उद्यानात रोजच काही विशिष्ट मंडळी माती नेणे, दूर्वा तोडत बसणे, झाडांची पाने, फुले, फांद्या तोडणे हे प्रकार करीत आहेत. काही शेजाऱ्यांनी आपल्या भिंतीलगतची झाडे तोडून टाकण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.