शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पाऊस

By admin | Updated: July 23, 2014 00:23 IST

किशोरसिंह चौव्हाण, मुखेड यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

किशोरसिंह चौव्हाण, मुखेडयंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत मुखेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.मागील १५ वर्षांच्या काळात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सागवान, चंदन, शिंदी, लिंब, बाभूळ आदी झाडांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने तेवढीच कत्तल तालुक्यात सुरु आहे. तालुक्यात एकमेव लेंडी नदी वाहते. या नदीवर धरण बांधण्याचे काम मागील तीस वर्षांपासून सुरु आहे. धरण अर्धवट अवस्थेत आहे. तालुक्यात कुंद्राळा, तामखेड, चांडोळा आदींसह १० ते १५ लघु तलाव आहेत. या तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात ७६ हजार ८०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, ८ हजार सिंचनेक्षत्र आहे. दरवर्षी जून महिन्यात पाऊस झाला की, पेरण्यांची लगबग सुरु होते. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. १० जुलै २०१४ रोजी तालुक्यातील मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, जांब, मुखेड या भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. पुढे पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र झाले उलटेच. पाऊसच आला नाही. १० जुलैच्या पावसाने तालुक्यात ३० टक्के पेरणी पूर्ण झाली. २९.९७ हेक्टरवर ज्वारी, ४ हजार २६४ हेक्टरवर सोयाबीन, १ हजार ७६७ हेक्टरवर कापूस, १३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उडीद, १ हजार ३४४ हेक्टरवर मुग, ८ हेक्टरवर बाजरी, १३ हेक्टरवर मका एवढी पेरणी तालुक्यात झाली. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात ८८ हजार ३०७ जनावरांची संख्या असून, ३३ हजार ५१० जनावरे आहेत. ५४ हजार ७९७ मोठी जनावरे आहेत. चार महिन्यांत गतवर्षीपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी जनावरांची संख्या घटल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. या जनावरांना दरमहा १२ हजार ८७० मेट्रीक टन चारा लागणार आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास डिसेंबर २०१४ पर्यंत २ लाख ५७ हजार ४०० मे. टन चारा लागणार आह तर ३१ मे २०१५ पर्यंत ५ लाख १४ हजार ८०० मेट्रीक टन चारा लागेल. सध्या तालुक्यात २१ जुलैपर्यंत ३४ हजार ४५३ मे.टन चारा शिल्लक आहे. हा चारा ८० दिवस पुरेल. यंदा जनावरांच्या चाऱ्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल, मागील वर्षी ज्वारीचा पेरा अल्प झाल्याने शेतकऱ्यांकडे ज्वारी शिल्लक राहिली नाही. वाडी-तांड्यावर १५ जुलैपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ३० गावे, २१ वाडी ताड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.७६ विहीर, बोअर अधिग्रहण करुन वाडी- तांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जाणकार आणि जुन्या पिढीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशीच स्थिती १९७२ मध्ये निर्माण झाली होती. मागील ११ वर्षांतील पाऊस २००४ मध्ये ९०२ मि.मी, २००५ मध्ये ९०० मि.मी, २००६ मध्ये ८१० मि.मी., २००७-०८ मध्ये ६७९, २००८ मध्ये ६३५, २००९ मध्ये ३८९, २०१० - ८८६, २०११- ७४२, २०१२-५९४, २०१३-१०५१ आणि २० जुलैपर्यंत २०१४ पर्यंत केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद तालुक्यात झाली. पेरणीचे दिवस संपले आहेत. आता तर उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस आदी पिकेही येणे अवघड आहे तर मागील ११ वर्षांत २१ जुलैपर्यंत २००४-२०२ मि.मी, २००५-३०३, २००६-१३२, २००७-१५५, २००८-१२६, २००९-८६, २०१०-२४०, २०११-२४६, २०१२-२८९, २०१३-४८१ पाऊस झाला होता.