शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्यांना ज्यांना ‘यांना’ संपवायचंय त्यांच्याविरुद्ध  आॅनलाइनचं हत्यार उपसण्यात आलंय’; कॉंग्रेस प्रवक्ते  राजू वाघमारे यांची सरकारवर टीकेची झोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:11 IST

ज्यांना ज्यांना संपवायचंय त्यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस सरकारनं ‘आॅनलाइनचं’ हत्यार उपसलं आहे आणि स्वत: मुख्यमंत्री वाक्यागणिक खोटं बोलून लोकांची सतत दिशाभूल करीत आहेत’ असा घणाघात घालत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी यासंदर्भात अनेक उदाहरणे पेश केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री वाक्यागणिक खोटं बोलतात८ नोव्हेंबरला काळा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

औरंगाबाद : ज्यांना ज्यांना संपवायचंय त्यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस सरकारनं ‘आॅनलाइनचं’ हत्यार उपसलं आहे आणि स्वत: मुख्यमंत्री वाक्यागणिक खोटं बोलून लोकांची सतत दिशाभूल करीत आहेत’ असा घणाघात घालत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी यासंदर्भात अनेक उदाहरणे पेश केली. शेतक-यांची कर्जमाफी हा त्याचा सर्वात मोठा पुरावा होय,असे ते म्हणाले. ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली तापडिया नाट्य मंदिरात शहर- जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे सामाजिक परिवर्तन अभियान मेळावा संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी पत्रपरिषदेत फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. 

‘ त्या’ स्कूलमध्ये आम्हालाही जायला आवडेलमुख्यमंत्री चांगली अ‍ॅक्टिंग करतात. खोटं बोलू शकतात. हे सगळं ते कुठं शिकले, त्या स्कूलमध्ये आम्हालाही जायला आवडेल, असे उद्गार यावेळी डॉ. वाघमारे यांनी काढले. सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळ विकासासाठी ३११ कोटी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु यातील ११ रु. सुद्धा दिले गेले नाहीत. कर्जमाफीची योजना शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करून यांनी अद्याप एकाही शेतकºयाला कर्जमाफी दिली नाही. हा शिवाजी महाराजांचा घोर अपमान होय. आता त्यांनी शिवाजी महाराजांची आणि जनतेची फसवणूक केल्याबद्दल हात जोडून माफी मागितली पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी व्यक्त केली.

कर्जमाफी आॅनलाइन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आॅनलाइन, पेपर तपासणी आॅनलाइन यात एक मोेठा घोटाळा दिसून येतो. तसेच या आॅनलाइनचा फटका शेतकरी, विद्यार्थी,युवक यांना बसून ते उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. या महत्त्वपूर्ण घटकांना आॅनलाइनचा काहीही फायदा झालेला नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींच्या चालीने देवेंद्र फडणवीस वागताहेत. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी योजनांच्या व्याख्या बदलताहेत. सरकारच्या फसवेगिरीविरुद्ध काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतो आहे,जनआक्रोश मेळावे घेत आहोत. ८ नोव्हेंबरला काळा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रपरिषदेस शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाबाभाऊ तायडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुनीता तायडे-निंबाळकर, डॉ. पवन डोंगरे आदींची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा