शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन की ऑफलाइन ? नवीन शैक्षणिक वर्षाबाबत विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 12:48 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university News : पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग-१ ऑक्टोबरपासून सुरू करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षात कोणत्या पद्धतीने वर्ग घ्यावेत याबद्दल संभ्रम

औरंगाबाद : यूजीसीने यंदा विद्यापीठे व महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाइन घ्यायचे की ऑफलाइन, याबद्दल संभ्रम कायम असून, विद्यापीठाचे लक्ष शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे लागलेले आहे. तथापि, यूजीसीच्या सूचना प्राप्त होण्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी २७ जुुलै रोजी विद्या परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्राच्या सहामाही परीक्षेला २९ जुलैपासून प्रारंभ करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. ( Online or offline? The University's attention to the government's guidelines regarding the new academic year ) 

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी यूजीसीने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठे व महाविद्यालयीन पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग-१ ऑक्टोबरपासून सुरू करणे अपेक्षित आहे. यूजीसीने म्हटले आहे की, यंदा नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनी प्रयत्न करावा. कोरोनास्थितीचा विचार करून त्या परिसरातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन की ऑफलाइन शिक्षण द्यायचे, याचा निर्णय घ्यायचा आहे, असे असले तरी राज्यातील कोरोनाच्या सद्य:स्थितीनुसार राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच वर्ग सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे विद्यापीठ सूत्रांचे म्हणणे आहे.

आमची तयारी आहे...१ ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतचे यूजीसीचे पत्र प्राप्त झाले आहे. आता आम्ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत आहोत. नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याबाबत आमची तयारी सुरू आहे. आम्ही चालू शैक्षणिक वर्षातील हिवाळी परीक्षा वेळेतच घेतल्या व निकालही घोषित केले आहेत. आता उन्हाळी परीक्षांचीही तयारी सुरू आहे. २७ जुलै रोजी विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाणार आहे, असे यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी