शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात आजपासून ऑनलाईन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 19:33 IST

राज्य शासनाने १ आॅगस्टपासून महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले होते.

ठळक मुद्देया निर्णयानुसार प्राध्यापकांना घरातूनच आॅनलाईन अध्यापन करावे लागणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्याही समस्या उद्भवणार आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात ऑनलाईन अध्यापन आणि अध्ययनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षणाची अंमलबाजवणी करण्याविषयी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पत्र काढले आहे. यात प्रत्यक्ष वर्गात शिकविण्याऐवजी ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचनांचा समावेश असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. 

राज्य शासनाने १ आॅगस्टपासून महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उच्चशिक्षण विभागाने महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनला सूचना देत आॅनलाईन शिक्षण देण्याची तयारी करण्याचे आदेश दिले होते. विद्यापीठ प्रशासनाने बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्यानंतर १ आॅगस्टपासून आॅनलाईन शिक्षण सुरू होणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, बकरी ईद, रविवार आल्यामुळे आॅनलाईन शिक्षणाची सुरुवात सोमवारपासून  सुरुवात होणार आहे. यासाठी सुटीच्या दिवशी परिपत्रक काढले आहे.

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना महाविद्यालयात बोलावण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यावर प्राध्यापक संघटनांच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानेच आॅनलाईन शिक्षण, प्राध्यापकांच्या उपस्थितीविषयी आदेश देण्याचा  निर्णय घेतला. या निर्णयानुसार प्राध्यापकांना घरातूनच आॅनलाईन अध्यापन करावे लागणार आहे. यासाठी प्राध्यापकांनी व्हिडिओ, आॅडिओसह पीडीएफ तयार केल्या आहेत. हे तयार केलेले साहित्य व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करून त्यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याविषयीच्या सूचनाही देण्यात  आलेल्या आहेत. शालेय शिक्षण आॅनलाईन  पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. यात काही प्रमाणात अडचणी येत असताना काही ठिकाणी सुरळीतपणे आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्याची पुनरावृत्ती महाविद्यालयात होणार आहे.

ग्रामीण भागात अडचणींचा डोंगरग्रामीण भागातील महाविद्यालयांत पूर्वीपासूनच विद्यार्थ्यांच्या उपस्थिताचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. यात आता आॅनलाईन शिक्षण असल्यामुळे तर येणारे विद्यार्थीही असणार नाहीत.  याचा परिणाम दीर्घकालीन होणार आहे. याचवेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्याही समस्या उद्भवणार आहेत. त्या सोडविण्यासाठी अद्याप  कोणत्याही उपाययोजना केल्या  नसल्याची माहिती समोर आली आहे.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइन