शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राणी अहिल्याबाई होळकरांचे एक समाजाभिमुख कार्य म्हणजे सातारा परिसरातील बारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:07 IST

साताऱ्यातील राणी अहिल्याबाईंच्या वारशाचे पुनरुज्जीवन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले खंडोबा मंदिर हे आजही हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचा जीर्णाेद्धार आणि पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून खोदण्यात आलेली बारव (पाण्याचा कुंड) हे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या समाजाभिमुख आणि दूरदृष्टीने केलेल्या कारभाराची साक्ष देतात.

अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी भारतभर विविध ठिकाणी मंदिरे, घाट, बारवा, विहिरी, धर्मशाळा अशा सार्वजनिक उपयोगाच्या वास्तूंचे निर्माण व पुनर्बांधणी केली होती. साताऱ्यातील खंडोबा मंदिर आणि त्याला लागून असलेली बारव ही त्याच कार्याची जिवंत साक्ष आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारवेमुळे त्या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली होती. बारव अजूनही वापरात असून, स्थानिक प्रशासनाने तिच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

इतिहास अभ्यासक डॉ. मोहित देसाई यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर यांचा प्रशासकीय कारभार केवळ धार्मिक नव्हे, तर सार्वजनिक विकास आणि पर्यावरणपूरक होता. त्यांनी जिथे मंदिरे उभारली, तिथे पाण्याची सोय केली. प्रवाशांच्या निवासासाठी धर्मशाळा बांधल्या. आजही राणी अहिल्याबाईंच्या कार्याचा ठसा देशभर अनेक स्थळांवर उमटलेला दिसून येतो. त्यांच्या या कारभाराची साक्ष देणारे साताऱ्यातील मंदिर व बारव असून, त्याचे जतन झाले पाहिजे.

मंदिराचे अर्धवट पडलेले काम शासन व पुरातत्व विभागाकडून सुरू झाले आहे. हे काम पारंपरिक वास्तुकलेच्या शैलीत करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थापत्यातील बारकावे जपण्यासाठी कुशल टीम काम करत आहे. मंदिराचे गतवैभव त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अहिल्यादेवींच्या स्मृतींना जतन करण्यासाठी ट्रस्टीदेखील सजग आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व पुरातत्व खात्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या वास्तूंच्या जतनासाठी संयुक्त प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांची आहे. पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व आहे. या ठिकाणाचा समावेश साताऱ्यातील पर्यटन नकाशात करून त्याचा विकास करणे शक्य आहे.- डॉ. विलास पारखे, धनगर समाजविषयक अभ्यासक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर