शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
2
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
3
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
4
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
5
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
6
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
7
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
8
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
9
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
10
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
11
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
12
या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 
13
तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी
14
Usha Nadkarni : ऑफिसमध्ये भावाला मारल्याचं समजताच उषा नाडकर्णींची सटकली, त्याला पकडलं अन्...
15
Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य!
16
इंधनावरील दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विम्यात फरक काय असतो? एकदा दोन्हींचे फायदे पहाच...
17
Water Taxi: वेळही वाचणार, प्रवासही सुखकर; मुंबईत सुरू होतेय वॉटर टॅक्सी, अवघ्या ४० मिनिटांत नवी मुंबई गाठा!
18
'रामायण'मधील शूर्पणखा आठवतेय का? रावणाची बहीण बनण्यासाठी मिळालेलं फक्त इतकं मानधन
19
“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे
20
IPL Final ची ओढ! विराटची साथ सोडल्याची चर्चा रंगली, पण तो दिवस उगवायच्या आत RCB च्या ताफ्यात

राणी अहिल्याबाई होळकरांचे एक समाजाभिमुख कार्य म्हणजे सातारा परिसरातील बारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:07 IST

साताऱ्यातील राणी अहिल्याबाईंच्या वारशाचे पुनरुज्जीवन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले खंडोबा मंदिर हे आजही हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचा जीर्णाेद्धार आणि पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून खोदण्यात आलेली बारव (पाण्याचा कुंड) हे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या समाजाभिमुख आणि दूरदृष्टीने केलेल्या कारभाराची साक्ष देतात.

अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी भारतभर विविध ठिकाणी मंदिरे, घाट, बारवा, विहिरी, धर्मशाळा अशा सार्वजनिक उपयोगाच्या वास्तूंचे निर्माण व पुनर्बांधणी केली होती. साताऱ्यातील खंडोबा मंदिर आणि त्याला लागून असलेली बारव ही त्याच कार्याची जिवंत साक्ष आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारवेमुळे त्या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली होती. बारव अजूनही वापरात असून, स्थानिक प्रशासनाने तिच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

इतिहास अभ्यासक डॉ. मोहित देसाई यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर यांचा प्रशासकीय कारभार केवळ धार्मिक नव्हे, तर सार्वजनिक विकास आणि पर्यावरणपूरक होता. त्यांनी जिथे मंदिरे उभारली, तिथे पाण्याची सोय केली. प्रवाशांच्या निवासासाठी धर्मशाळा बांधल्या. आजही राणी अहिल्याबाईंच्या कार्याचा ठसा देशभर अनेक स्थळांवर उमटलेला दिसून येतो. त्यांच्या या कारभाराची साक्ष देणारे साताऱ्यातील मंदिर व बारव असून, त्याचे जतन झाले पाहिजे.

मंदिराचे अर्धवट पडलेले काम शासन व पुरातत्व विभागाकडून सुरू झाले आहे. हे काम पारंपरिक वास्तुकलेच्या शैलीत करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थापत्यातील बारकावे जपण्यासाठी कुशल टीम काम करत आहे. मंदिराचे गतवैभव त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अहिल्यादेवींच्या स्मृतींना जतन करण्यासाठी ट्रस्टीदेखील सजग आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व पुरातत्व खात्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या वास्तूंच्या जतनासाठी संयुक्त प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांची आहे. पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व आहे. या ठिकाणाचा समावेश साताऱ्यातील पर्यटन नकाशात करून त्याचा विकास करणे शक्य आहे.- डॉ. विलास पारखे, धनगर समाजविषयक अभ्यासक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर