शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

शंभर कोटीतील रस्त्यांची कामे संथ; २०० कोटी रुपयांवर मनपा फेरणार पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:38 IST

७५ कोटी खर्च केल्यास मिळणार होते २०० कोटी

ठळक मुद्देशासनाचे १०० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत पडून असताना रस्त्यांची कामे का रखडली.सप्टेंबर अखेरपर्यंत कंत्राटदारांनी ७५ टक्के  कामे करणे गरजेचे होते.

औरंगाबाद : रस्त्यांसाठी दिलेले शंभर कोटी रुपये लवकर खर्च करा, आणखी २०० कोटी देतो, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले खरे मात्र महापालिकेला शंभर कोटीपैकी ७५ कोटी रुपयेही खर्च करता आलेले नाहीत. त्यामुळे मनपा २०० कोटी रुपयांना मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शहरात १०० कोटींतील रस्त्यांची कामे कंत्राटदारांकडून संथगतीने सुरू आहेत, तर महापालिका प्रशासन ही कामे करुन घेण्यात कमी पडत आहे. या बाबीचे पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवकांनी कंत्राटदारांच्या मनमानीचा अक्षरश: पाढाच वाचला. सप्टेंबर अखेरपर्यंत ७५ टक्के काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांना दंड आकारण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. गणेशोत्सव संपताच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये मनपाला शंभर कोटींतील ७५ टक्के रक्कम खर्च करता येणार नाही. त्यामुळे शासनाकडून रस्त्यांसाठी आणखी २०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. कंत्राटदारांमुळे महापालिकेला २०० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार हे निश्चित. 

शासनाचे १०० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत पडून असताना रस्त्यांची कामे का रखडली. प्रशासन कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे. अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी खोदकाम केले आहे तर काही ठिकाणी रस्त्यांची एक बाजू बंद असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. मनपा अधिकारी काम करून घेण्यास असमर्थ ठरले असून, नागरिक नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत, अशी कैफियत जंजाळ यांनी मांडली. राजू शिंदे यांनी रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

सचिन खैरे यांनी जुन्या शहरातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? अशा प्रश्न केला. त्यावर तांत्रिक विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी नमूद केले की, सप्टेंबर अखेरपर्यंत कंत्राटदारांनी ७५ टक्के  कामे करणे गरजेचे होते. महापालिकेने ठरवून दिलेल्या टप्प्यानुसार कामे होत नाहीत, हे खरे आहे.  त्यामुळे दंडात्मक कारवाईच्या नोटिसा  चारही कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी त्यांना ब्लॅकलिस्टही केले जाईल, असेही काझी यांनी नमूद केले.

घोडेस्वारी केल्यासारखे वाटते१०० कोटींत आतापर्यंत तयार झालेल्या रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत असला तरी या रस्त्यांवरून वाहनाद्वारे चक्कर मारल्यास घोडेस्वारी केल्याचा अनुभव येतो. ४अनेक ठिकाणी निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. यावरही काझी यांनी सांगितले की, पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी केली जात आहे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारfundsनिधी