शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

शंभर कोटीतील रस्त्यांची कामे संथ; २०० कोटी रुपयांवर मनपा फेरणार पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:38 IST

७५ कोटी खर्च केल्यास मिळणार होते २०० कोटी

ठळक मुद्देशासनाचे १०० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत पडून असताना रस्त्यांची कामे का रखडली.सप्टेंबर अखेरपर्यंत कंत्राटदारांनी ७५ टक्के  कामे करणे गरजेचे होते.

औरंगाबाद : रस्त्यांसाठी दिलेले शंभर कोटी रुपये लवकर खर्च करा, आणखी २०० कोटी देतो, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले खरे मात्र महापालिकेला शंभर कोटीपैकी ७५ कोटी रुपयेही खर्च करता आलेले नाहीत. त्यामुळे मनपा २०० कोटी रुपयांना मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शहरात १०० कोटींतील रस्त्यांची कामे कंत्राटदारांकडून संथगतीने सुरू आहेत, तर महापालिका प्रशासन ही कामे करुन घेण्यात कमी पडत आहे. या बाबीचे पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवकांनी कंत्राटदारांच्या मनमानीचा अक्षरश: पाढाच वाचला. सप्टेंबर अखेरपर्यंत ७५ टक्के काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांना दंड आकारण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. गणेशोत्सव संपताच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये मनपाला शंभर कोटींतील ७५ टक्के रक्कम खर्च करता येणार नाही. त्यामुळे शासनाकडून रस्त्यांसाठी आणखी २०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. कंत्राटदारांमुळे महापालिकेला २०० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार हे निश्चित. 

शासनाचे १०० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत पडून असताना रस्त्यांची कामे का रखडली. प्रशासन कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे. अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी खोदकाम केले आहे तर काही ठिकाणी रस्त्यांची एक बाजू बंद असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. मनपा अधिकारी काम करून घेण्यास असमर्थ ठरले असून, नागरिक नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत, अशी कैफियत जंजाळ यांनी मांडली. राजू शिंदे यांनी रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

सचिन खैरे यांनी जुन्या शहरातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? अशा प्रश्न केला. त्यावर तांत्रिक विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी नमूद केले की, सप्टेंबर अखेरपर्यंत कंत्राटदारांनी ७५ टक्के  कामे करणे गरजेचे होते. महापालिकेने ठरवून दिलेल्या टप्प्यानुसार कामे होत नाहीत, हे खरे आहे.  त्यामुळे दंडात्मक कारवाईच्या नोटिसा  चारही कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी त्यांना ब्लॅकलिस्टही केले जाईल, असेही काझी यांनी नमूद केले.

घोडेस्वारी केल्यासारखे वाटते१०० कोटींत आतापर्यंत तयार झालेल्या रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत असला तरी या रस्त्यांवरून वाहनाद्वारे चक्कर मारल्यास घोडेस्वारी केल्याचा अनुभव येतो. ४अनेक ठिकाणी निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. यावरही काझी यांनी सांगितले की, पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी केली जात आहे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारfundsनिधी