शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एक तपाच्या तपस्येनंतर बनतात वैदिक, त्यांना प्रतिष्ठा मिळायला हवी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 5, 2023 13:46 IST

४०० वैदिकांच्या मंत्रोच्चाराने संमेलनाला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षणपूर्ण करण्यासाठी ५ वर्षे लागतात, अभियांत्रिकीचे शिक्षणासाठी ४ वर्षे लागतात. त्यांच्याकडे समाज सन्मानाने बघत असतो. मात्र, वेदपाठींना वेद मुखोद्गद करण्यासाठी तब्बल १२ वर्षे तपस्या करतात. याच वेदपाठींनी आपले लाखोवर्ष जुनी वैदिक परंपरा मुखोद्गद जतन करून ठेवली आहे. मात्र, अशा वैदिक पंडितांना समाजात पाहिजे तसा सन्मान, प्रतिष्ठा दिली जात नाही. त्यांना यथोचित सन्मान, प्रतिष्ठा मिळण्यासाठीच देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वैदिक संमेलनाचे आयोजन केल्या जात असल्याची माहिती शारदा पीठामचे महाव्यवस्थापक पद्मश्री डाॅ. व्ही. आर. गौरीशंकर यांनी येथे दिली.

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थान, दक्षिणामान्य श्री शारदापीठम् यांच्या वतीने व संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान व श्रीकृष्ण गुरुकुल वेदपाठशाळाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘वैदिक संमेलना’ला सुरुवात झाली. यावेळी विद्या भारती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास यज्ञसुब्रह्मण्यम यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र व गोवातून आलेल्या ४०० पेक्षा अधिक वैदिकांनी मंत्रोच्चार करीत सप्तपदी मंगल कार्यालयातील संपूर्ण वातावरण मंगलमय केले. यावेळी धर्मपीठावर डॉ. व्ही. आर. गौरीशंकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम ऋग्वेद म्हणजे काय हे सांगत वेदपाठींनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदाचे एकानंतर एक मंत्रोघोष करण्यात आला. त्यानंतर वेदपारायणावर व शास्त्रावर चर्चासत्र झाले. वेदपाठींच्या सहभागाने हे चर्चासत्र रंगले होते. स्वागतपर भाषणात वेदमूर्ती दुर्गादास मुळे यांनी सर्व वैदिकांचे स्वागत केले.

तरुणाई वळतिये वेद अध्यायनाकडेडाॅ. व्ही. आर. गौरीशंकर यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी बिकट काळ आला होता. मात्र, आता मोठ्या प्रमाणात तरुणाई वैदिक शिक्षणाकडे वळत आहे. वैदिक संमेलनात ४०० वेदपाठी आले त्यातील निम्मे वैदिक हे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत.

शोभायात्रेने लक्षवेधलेवैदिक संमेलनाची सुरुवात शोभायात्रेने झाली. जळगावरोडवरील रेणुकामाता मंदिरात पूजाअर्चा करून शोभायात्रा सुरू झाली. यात दोन रथावर वेदमूर्ती विराजमान झाले होते. महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत ५० पेक्षा अधिक बटू शोभायात्रेची शान ठरले.

वेदमूर्तींचा गौरववैदिक संमेलनात वेदमूर्तींचा सत्कार करण्यात आला. यात स्वानंद धायगुडे (पुणे), भास्कर जोशी (ढालेगाव), डॉ.अशोक देव (छत्रपती संभाजीनगर), सचिन वैद्य (धाराशिव) व देवदत्तशास्त्री पाटील (गोवा) यांच्या कार्याचा गौरव डाॅ. व्ही. आर. गौरीशंकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आज संमेलनाचा समारोपवैदिक संमेलनाचा उद्या शनिवारी अखेरचा दिवस आहे. सकाळी ८:३० वाजेपासून सर्व वेदपारायण व शास्त्र चर्चा, सकाळी ११:३० ते दु १ वा परिसंवाद, चर्चासत्र व दु.३:३० ते सायं ५ वाजेदरम्यान समारोप सत्र.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAurangabadऔरंगाबाद