शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

By संतोष हिरेमठ | Updated: July 10, 2024 20:05 IST

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेतील गटबाजी, नाराजी की विरोधकांचा डाव?

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अमरप्रित चौकात सोमवारी रात्री ‘एक विधानसभा, ५ लोकांना शब्द कसा पाळणार’ असा सवाल करणारे बॅनर झळकले. उद्धवसेनेतील गटबाजी, विधानसभेसाठी ‘पश्चिम’मधून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या नाराजीतून हे बॅनर लागले की, ही विरोधकांची खेळी आहे, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

या बॅनरमधून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल करण्यात आला. या बॅनरचा फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. त्याविषयी एकच चर्चा सुरु झाली. हे बॅनर मंगळवारी मात्र हटविण्यात आले. हे बॅनर नेमके कोणी लावले, हे समजू शकले नाही. बॅनर कोणी लावले, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या.

काय लिहिले बॅनरवर?‘कधी तरी शब्द पाळणार का उद्धवजी’, ‘लाेकसभा निवडणूक काढण्यासाठी दिलेला शब्द पाळणार का? उद्धवजी’ आणि ‘एक विधानसभा, पाच लाेकांना शब्द कसा पाळणार उद्धवजी’ असे या बॅनरवर लिहिले होते.

उद्धवसेनेतील इच्छुकलोकसभेतील पराभवानंतर खैरे हे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध ‘पश्चिम’मधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय साळवे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता राजू शिंदे यांच्या प्रवेशाने उद्धवसेनेकडून ‘पश्चिम’मधून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा आहे.

शब्द नाहीमातोश्रीवरून कोणालाही असा शब्द दिला जात नाही. मूल्यमापन केले जाते. पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांना मान्य असतो, मलाही असा काही शब्द दिलेला नाही. हे बॅनर लावण्याचे काम विरोधकांचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.- विजय साळवे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

शब्द नाही, आदेश दिला तर मी लढेनपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. आदेश दिला तर ‘पश्चिम’मधून मी उभा राहील. कारण आमदार संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीत पाडणे गरजेचे आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते सर्व उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल.- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते (उद्धवसेना)

मूल्यमापन करूनच उमेदवारीपक्षात असा शब्द दिला जात नाही. पक्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. जो विजयी होऊ शकतो, अशांनाच उमेदवारी दिली जाते. ज्यांचा पक्षाशी, मतदारसंघाशी संबंध नाही किंवा पदावर असूनही सक्रिय नाही, अशा लोकांचा पक्ष विचार करू शकतो का, हाही प्रश्न आहे.- राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024