शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

By संतोष हिरेमठ | Updated: July 10, 2024 20:05 IST

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेतील गटबाजी, नाराजी की विरोधकांचा डाव?

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अमरप्रित चौकात सोमवारी रात्री ‘एक विधानसभा, ५ लोकांना शब्द कसा पाळणार’ असा सवाल करणारे बॅनर झळकले. उद्धवसेनेतील गटबाजी, विधानसभेसाठी ‘पश्चिम’मधून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या नाराजीतून हे बॅनर लागले की, ही विरोधकांची खेळी आहे, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

या बॅनरमधून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल करण्यात आला. या बॅनरचा फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. त्याविषयी एकच चर्चा सुरु झाली. हे बॅनर मंगळवारी मात्र हटविण्यात आले. हे बॅनर नेमके कोणी लावले, हे समजू शकले नाही. बॅनर कोणी लावले, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या.

काय लिहिले बॅनरवर?‘कधी तरी शब्द पाळणार का उद्धवजी’, ‘लाेकसभा निवडणूक काढण्यासाठी दिलेला शब्द पाळणार का? उद्धवजी’ आणि ‘एक विधानसभा, पाच लाेकांना शब्द कसा पाळणार उद्धवजी’ असे या बॅनरवर लिहिले होते.

उद्धवसेनेतील इच्छुकलोकसभेतील पराभवानंतर खैरे हे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध ‘पश्चिम’मधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय साळवे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता राजू शिंदे यांच्या प्रवेशाने उद्धवसेनेकडून ‘पश्चिम’मधून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा आहे.

शब्द नाहीमातोश्रीवरून कोणालाही असा शब्द दिला जात नाही. मूल्यमापन केले जाते. पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांना मान्य असतो, मलाही असा काही शब्द दिलेला नाही. हे बॅनर लावण्याचे काम विरोधकांचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.- विजय साळवे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

शब्द नाही, आदेश दिला तर मी लढेनपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. आदेश दिला तर ‘पश्चिम’मधून मी उभा राहील. कारण आमदार संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीत पाडणे गरजेचे आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते सर्व उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल.- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते (उद्धवसेना)

मूल्यमापन करूनच उमेदवारीपक्षात असा शब्द दिला जात नाही. पक्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. जो विजयी होऊ शकतो, अशांनाच उमेदवारी दिली जाते. ज्यांचा पक्षाशी, मतदारसंघाशी संबंध नाही किंवा पदावर असूनही सक्रिय नाही, अशा लोकांचा पक्ष विचार करू शकतो का, हाही प्रश्न आहे.- राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024