शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

अरे बाप रे ! जायकवाडीतील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे रोज बाष्पीभवन, हक्काचे पाणी हवेत

By बापू सोळुंके | Updated: April 7, 2023 15:46 IST

एप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पात आज १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील उन्हाळ्यातील तापमान ४३ अंशांपर्यंत गेलेले आहेत. उन्हाचा चटका वाढताच जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात होते. वर्षभरात सरासरी १२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होऊन हे पाणी हवेत मिसळत असल्याचे समोर आले आहे.

नाथसागरात आज १३३९ दलघमी पाणीसाठाजायकवाडी धरणातून मराठवाड्यातील सुमारे दीड लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, जिल्ह्यातील शेकडो गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. आज या धरणात १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला पाच दिवसांआड पाणीशहराची वाढत्या लोकसंख्येसाठी जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्याने सर्व वसाहतींना रोज पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. यामुळे गेली काही वर्षे आपल्या शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. याविषयी नाराजी व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

शहराला रोज किती लागते पाणी?छत्रपती संभाजीनगर शहराला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर अशी जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. जुन्या जलवाहिनीद्वारे १४० एमएलडी रोज पाणीपुरवठा शहराला केला जातो. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने हर्सूल तलावातून ६ एमएलडी पाणी घेण्यात येते, तर विविध वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडूनही प्रतिदिन सुमारे दोन एमएलडी पाणी घेण्यात येते.

रोज १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होतेएप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे. ६ एप्रिल रोजी जायकवाडी धरणातील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे बाष्पीभवन मापक यंत्राच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

अधिकाऱ्याची प्रतिक्रियामराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून दररोज किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याबाबतचा अहवाल रोज शासनास देण्यात येतो. हे बाष्पीभवन मोजण्यासाठी धरणस्थळी बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आले आहेत. साधारणपणे वर्षभरात दहा ते बारा दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. विशेषत: मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सर्वाधिक तर पावसाळ्यात सर्वात कमी असते. धरणाशेजारी पक्षी अभयारण्य असल्याने बाष्पीभवन रोखण्याची केमिकल प्रक्रिया करता येत नाही.- व्ही. पी. काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी प्रकल्प

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद