शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे बाप रे ! जायकवाडीतील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे रोज बाष्पीभवन, हक्काचे पाणी हवेत

By बापू सोळुंके | Updated: April 7, 2023 15:46 IST

एप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पात आज १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील उन्हाळ्यातील तापमान ४३ अंशांपर्यंत गेलेले आहेत. उन्हाचा चटका वाढताच जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात होते. वर्षभरात सरासरी १२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होऊन हे पाणी हवेत मिसळत असल्याचे समोर आले आहे.

नाथसागरात आज १३३९ दलघमी पाणीसाठाजायकवाडी धरणातून मराठवाड्यातील सुमारे दीड लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, जिल्ह्यातील शेकडो गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. आज या धरणात १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला पाच दिवसांआड पाणीशहराची वाढत्या लोकसंख्येसाठी जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्याने सर्व वसाहतींना रोज पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. यामुळे गेली काही वर्षे आपल्या शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. याविषयी नाराजी व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

शहराला रोज किती लागते पाणी?छत्रपती संभाजीनगर शहराला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर अशी जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. जुन्या जलवाहिनीद्वारे १४० एमएलडी रोज पाणीपुरवठा शहराला केला जातो. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने हर्सूल तलावातून ६ एमएलडी पाणी घेण्यात येते, तर विविध वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडूनही प्रतिदिन सुमारे दोन एमएलडी पाणी घेण्यात येते.

रोज १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होतेएप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे. ६ एप्रिल रोजी जायकवाडी धरणातील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे बाष्पीभवन मापक यंत्राच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

अधिकाऱ्याची प्रतिक्रियामराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून दररोज किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याबाबतचा अहवाल रोज शासनास देण्यात येतो. हे बाष्पीभवन मोजण्यासाठी धरणस्थळी बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आले आहेत. साधारणपणे वर्षभरात दहा ते बारा दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. विशेषत: मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सर्वाधिक तर पावसाळ्यात सर्वात कमी असते. धरणाशेजारी पक्षी अभयारण्य असल्याने बाष्पीभवन रोखण्याची केमिकल प्रक्रिया करता येत नाही.- व्ही. पी. काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी प्रकल्प

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद