शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

अरे बाप रे ! जायकवाडीतील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे रोज बाष्पीभवन, हक्काचे पाणी हवेत

By बापू सोळुंके | Updated: April 7, 2023 15:46 IST

एप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागर प्रकल्पात आज १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील उन्हाळ्यातील तापमान ४३ अंशांपर्यंत गेलेले आहेत. उन्हाचा चटका वाढताच जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात होते. वर्षभरात सरासरी १२ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होऊन हे पाणी हवेत मिसळत असल्याचे समोर आले आहे.

नाथसागरात आज १३३९ दलघमी पाणीसाठाजायकवाडी धरणातून मराठवाड्यातील सुमारे दीड लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, जिल्ह्यातील शेकडो गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. आज या धरणात १३३९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

शहराला पाच दिवसांआड पाणीशहराची वाढत्या लोकसंख्येसाठी जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असल्याने सर्व वसाहतींना रोज पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. यामुळे गेली काही वर्षे आपल्या शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. याविषयी नाराजी व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

शहराला रोज किती लागते पाणी?छत्रपती संभाजीनगर शहराला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर अशी जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. जुन्या जलवाहिनीद्वारे १४० एमएलडी रोज पाणीपुरवठा शहराला केला जातो. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने हर्सूल तलावातून ६ एमएलडी पाणी घेण्यात येते, तर विविध वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडूनही प्रतिदिन सुमारे दोन एमएलडी पाणी घेण्यात येते.

रोज १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होतेएप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे. ६ एप्रिल रोजी जायकवाडी धरणातील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे बाष्पीभवन मापक यंत्राच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

अधिकाऱ्याची प्रतिक्रियामराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून दररोज किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याबाबतचा अहवाल रोज शासनास देण्यात येतो. हे बाष्पीभवन मोजण्यासाठी धरणस्थळी बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात आले आहेत. साधारणपणे वर्षभरात दहा ते बारा दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. विशेषत: मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सर्वाधिक तर पावसाळ्यात सर्वात कमी असते. धरणाशेजारी पक्षी अभयारण्य असल्याने बाष्पीभवन रोखण्याची केमिकल प्रक्रिया करता येत नाही.- व्ही. पी. काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी प्रकल्प

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद