शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

ज्ञानमंदिरात ‘ओली पार्टी’

By admin | Updated: April 30, 2016 00:09 IST

वाळूज महानगर : ज्ञानमंदिर समजल्या जाणाऱ्या रांजणगाव जिल्हा परिषद शाळेतच शुक्रवारी भरदिवसा शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रचलेला ‘ओल्या पार्टी’चा बेत जागरुक नागरिकांनी उधळून लावला.

वाळूज महानगर : ज्ञानमंदिर समजल्या जाणाऱ्या रांजणगाव जिल्हा परिषद शाळेतच शुक्रवारी भरदिवसा शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रचलेला ‘ओल्या पार्टी’चा बेत जागरुक नागरिकांनी उधळून लावला. या पार्टीची कुणकुण लागताच नागरिक शाळेत पोहोचताच तेथे ‘ताव’ मारण्यासाठी तयार असलेल्या या पदाधिकाऱ्यांनी पार्टीसाठी तयार केलेले अन्न फेकून देऊन शाळेतून धूम ठोकली. शाळेवर नियंत्रण ठेवण्याची, दर्जा सुधारण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनीच ज्ञानमंदिराचा असा गैरवापर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन पंचनामा केला. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या शाळेला सुट्या लागलेल्या आहेत. सकाळी काही वेळेसाठी शिक्षक, इतर कर्मचारी शाळेत येतात. दुपारनंतर शाळा बंदच असतात. शाळेला सुटी असल्याची संधी साधून रांजणगाव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतच ओली पार्टी करण्याचा बेत आखला. सकाळी काही वेळ काम केल्यानंतर शिक्षक शाळेतून जाताच या पदाधिकाऱ्यांनी शाळा आपल्या ताब्यात घेतली. मग पार्टीसाठी या पदाधिकाऱ्यांनी चिकन, चपात्या, भात इ. स्वयंपाकही बनविला. पार्टीसाठी हजर असलेल्या काही जणांनी या ज्ञानमंदिरातच मनसोक्तमद्य प्राशन केले. जेवणावर ताव मारण्याच्या तयारीत हे सर्व जण होते. अन्न फेकून ठोकली धूम माहिती मिळताच जि. प. सदस्य अ‍ॅड. मनोहर गवई, उपसरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, सुभाष सोनवणे, दीपक बडे, संतोष लोहकरे, संजय तोगे, विजय तोगे, राजेंद्र उढाण, संतोष राऊत, संतोष निकम आदींनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. नागरिक येत असल्याचे नजरेस पडताच आत जेवणाच्या तयारीत असलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली. अन्न खिडकीतून बाहेर फेकून देऊन या पदाधिकाऱ्यांनी शाळेतून धूम ठोकली. शाळेच्या आवारात पार्टीसाठी तयार करण्यात आलेले अन्न, भांडी, पत्रावळ्या इ. साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. या प्रकारामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी गंगापूरच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, मुख्याध्यापिका मीनाक्षी पाठक, मुख्याध्यापिका एस. एम. काझी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. हरिनाम सप्ताहामुळे लागली कुणकु ण एरवी या पदाधिकाऱ्यांना ही पार्टी ‘पचली’ असती; परंतु सध्या शाळेलगतच्या श्रीरामनगर या वसाहतीत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी सप्ताहाचा समारोप असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने शाळेजवळून ये-जा करीत होते. त्यामुळे ज्ञानमंदिरातील पार्टीचा हा गोंधळ काही भाविकांच्या नजरेस पडला. या भाविकांनी पार्टीची माहिती ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पंचनामा शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शाळेला भेट देऊन माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी पाठक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एस. एम. काझी आदींशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून घेतले. यावेळी उपस्थितांना शाळेच्या आवारात पार्टीसाठी तयार केलेले अन्न व साहित्य आढळले असून, याचा पंचनामाही करण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांनी दोन्ही मुख्याध्यापिकांची कानउघाडणी केली. शिक्षकांच्या माघारी घडलेला प्रकार याविषयी मुख्याध्यापिका एस. एम. काझी व मुख्याध्यापिका मीनाक्षी पाठक म्हणाल्या की, शाळेतील दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर आम्ही व शिक्षक दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घरी निघून गेलो. नंतर आमच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला. आता शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आपल्याला याबाबत काहीच माहीत नव्हते, असे म्हणत असले तरी शाळेच्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय ही पार्टी शक्य नाही, हेही तितकेच खरे आहे. कारण या पदाधिकाऱ्यांना पार्टीसाठी शाळा कुणी उघडून दिली? हा प्रश्न निर्माण होत आहे.