शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पंतप्रधानांना खुश करण्यासाठी जुन्याच योजनांना 'नमो' नाव; दानवेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: September 18, 2023 14:53 IST

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी साधला मुख्यमंत्र्यावर निशाणा

छत्रपती संभाजीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने रविवारी नमो नावाने अकरा कलमी योजना जाहीर केल्या. या सर्व योजना महाविकास आघाडी सरकार आणि त्यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळापासून सुरू आहेत, यात एकही नवीन योजना नाही. केवळ मोदींजींना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नमो नावाने घोषणा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेता आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो अकरा कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. यात नमोे महिला सशक्तिकरण अभियान., नमो कामगार कल्याण अभियान, नमो शेततळी अभियान, नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियान, नमो गरीब व मागासवर्गिय सन्मान अभियान, नमो ग्राम सचिवालय अभियान,नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान,नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्यीकरण अभियान आणि नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान आदींचा समावेश आहे. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आणि महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत महिलांना अर्थसहाय्य देण्यात येते. यामुळे ही योजना नवी कशी म्हणता येईल, असा सवाल दानवे यांनी केला.

तसेच कामगार कल्याण विभागाकडून अनेक वर्षापासून कामगारांना किट वाटप करण्यात येते, एवढेच नव्हे तर आरोग्य तपासणीसह विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.मागेल त्याला शेततळी योजना ही मागील पाच वर्षापासून सुरू आहे. शिवाय रोहयोमधूनही शेततळ्यासाठी अनुदान देण्यात येते. यामुळे नमो शेततळी योजना नवीन नाही. आत्मनिर्भर आणि सौरउर्जा गाव योजना. देशभरात डिजिटल इंडिया योजनेंतर्गत प्रत्येक गाव इंटरनेटने जोडले गेले आहे. पूर्वीपासूनच राज्यात स्मार्ट सिटी योजना आणि स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून काम सुरूच आहे. असे असताना नमो शहर सांदर्यीकरण योजना नावालाच आहे. सन २००१ च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर मैदान उभारण्याचा आणि खेळाडूंना सुविधा देण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळे ही योजना नवीन कशी म्हणता येईल. नमो दिव्यांग शक्ती योजनेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला होता. वास्तविक आपल्याकडे स्वावलंबन योजनेंतर्गत दिव्यांगाना एस.टी.बस, रेल्वे प्रवास सवलत, कर्ज देण्याच्या जुन्या योजना आहेत. नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान काही नवीन नाही.कारण यापूर्वी समग्र शिक्षा अभियानांतगत सर्व सुविधा पूर्वीच दिल्या जायच्या, असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेAmbadas Danweyअंबादास दानवेNarendra Modiनरेंद्र मोदी