शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

पंतप्रधानांना खुश करण्यासाठी जुन्याच योजनांना 'नमो' नाव; दानवेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: September 18, 2023 14:53 IST

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी साधला मुख्यमंत्र्यावर निशाणा

छत्रपती संभाजीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने रविवारी नमो नावाने अकरा कलमी योजना जाहीर केल्या. या सर्व योजना महाविकास आघाडी सरकार आणि त्यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळापासून सुरू आहेत, यात एकही नवीन योजना नाही. केवळ मोदींजींना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नमो नावाने घोषणा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेता आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो अकरा कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. यात नमोे महिला सशक्तिकरण अभियान., नमो कामगार कल्याण अभियान, नमो शेततळी अभियान, नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियान, नमो गरीब व मागासवर्गिय सन्मान अभियान, नमो ग्राम सचिवालय अभियान,नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान,नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्यीकरण अभियान आणि नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान आदींचा समावेश आहे. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आणि महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत महिलांना अर्थसहाय्य देण्यात येते. यामुळे ही योजना नवी कशी म्हणता येईल, असा सवाल दानवे यांनी केला.

तसेच कामगार कल्याण विभागाकडून अनेक वर्षापासून कामगारांना किट वाटप करण्यात येते, एवढेच नव्हे तर आरोग्य तपासणीसह विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.मागेल त्याला शेततळी योजना ही मागील पाच वर्षापासून सुरू आहे. शिवाय रोहयोमधूनही शेततळ्यासाठी अनुदान देण्यात येते. यामुळे नमो शेततळी योजना नवीन नाही. आत्मनिर्भर आणि सौरउर्जा गाव योजना. देशभरात डिजिटल इंडिया योजनेंतर्गत प्रत्येक गाव इंटरनेटने जोडले गेले आहे. पूर्वीपासूनच राज्यात स्मार्ट सिटी योजना आणि स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून काम सुरूच आहे. असे असताना नमो शहर सांदर्यीकरण योजना नावालाच आहे. सन २००१ च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर मैदान उभारण्याचा आणि खेळाडूंना सुविधा देण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळे ही योजना नवीन कशी म्हणता येईल. नमो दिव्यांग शक्ती योजनेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला होता. वास्तविक आपल्याकडे स्वावलंबन योजनेंतर्गत दिव्यांगाना एस.टी.बस, रेल्वे प्रवास सवलत, कर्ज देण्याच्या जुन्या योजना आहेत. नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान काही नवीन नाही.कारण यापूर्वी समग्र शिक्षा अभियानांतगत सर्व सुविधा पूर्वीच दिल्या जायच्या, असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेAmbadas Danweyअंबादास दानवेNarendra Modiनरेंद्र मोदी