शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अहो आश्चर्यम्... आरोग्य विभागाने पकडले २४९ डास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:25 IST

कामाची अशीही जबाबदारी 

ठळक मुद्देहत्तीरोग पसरविणाऱ्या ‘क्युलेक्स’ डासांची संख्या सर्वाधिक‘क्युलेक्स’ पाठोपाठ डेंग्यूचा ‘एडिस’ डास

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभाग म्हटला की, रुग्णालये आणि रुग्णसेवा ही कामे करणारा विभाग असे तुम्ही म्हणाल. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिनाभरात शहरात तब्बल २४९ डास पकडले. हो... डासच पकडले. तुम्ही म्हणाल, डेंग्यू रोखण्यासाठी आता डास पकडण्याची मोहीम सुरू केली की काय? तर तसे काही नाही, तर पकडलेल्या डासांमध्ये कोणता रोग पसरविणाऱ्या डासांची संख्या अधिक आहे, हे पाहून त्यावरून आरोग्य विभागाची कामाची दिशा, धोरण व उपाययोजना ठरते. मात्र, ही बाब सर्वसामान्यांपासून अनभिज्ञ आहे.जुलैपासून शहराला डेंग्यूचा महाविळखा बसला. महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागालाही शहरातील रस्त्यांवर उतरावे लागले. ‘डेंग्यू’ पसरविण्यास ‘एडिस’ नावाचा डास कारणीभूत ठरतो. 

‘एडिस’सह क्युलेक्स आणि अ‍ॅनफिलिस या प्रकारचे डास प्रामुख्याने आढळतात. क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग तर अ‍ॅनफिलिस डासामुळे हिवताप (मलेरिया) ची लागण होते. शहरात डेंग्यूची परिस्थिती पाहता कोणत्या प्रकारचे डास सर्वाधिक आहे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागातर्फे डासांची घनता काढली जाते. ही घनता काढण्यासाठीच कर्मचाऱ्यांना डास पकडावे लागतात.

असे पकडतात डास?ज्या भागांत डास अळींचे प्रमाण आढळते, त्या भागात सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान डास पकडण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी अडीच तास दिला जातो. एक लांब प्लास्टिकची नळी डासाजवळ धरली जाते. नळीच्या दुसऱ्या टोकातून तोंडावाटे कर्मचारी हवा आतमध्ये ओढतात. नळीच्या दुसऱ्या टोकाला जाळी असते. त्यामुळे डास तोंडात येत नाही. पकडलेले डास परीक्षा नळीत घेतले जातात. त्यानंतर तो कोणता डास आहे, याचा शोध घेतला जातो.

८१ ‘एडिस’ डास२४९ डासांमध्ये ९१ क्युलेक्स डास आढळले. शहरात डेंग्यूचा उद्रेक पसरविणारे ‘एडिस’ प्रकारचे ८१ डास पकडण्यात आले. या डासांमुळे डेंग्यूबरोबर चिकुनगुनियाची लागण होते, तर ७७ अ‍ॅनाफिलिस डास पकडण्यात आले. शहरात जुलैपासून आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २८१ वर गेली आहे. हत्तीरोगाची रुग्णसंख्या ६८ आहे; परंतु ही संख्या अनेक वर्षांची असून, केवळ ९ रुग्ण नवीन असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

या भागांतून डास जेरबंद२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान विजयनगर, पडेगाव, जाधववाडी, घाटी निवासस्थान, चेलीपुरा, नारेगाव, रोशनगेट परिसर, संग्रामनगर, मिसारवाडी, खोकडपुरा, ज्योतीनगर, हिनानगर, आरेफ कॉलनी, एन-९, कैसर कॉलनी, मुकुंदवाडी भागांतून हे २४९ डास पकडण्यात आले.

उपाययोजना करण्यास मदतडास पकडून त्यातून डासांची घनता काढली जाते. आढळणाऱ्या डासांनुसार एखादा आजार वाढू शकतो का, याचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातात. - डॉ. विनायक भटकर, सहायक संचालक (हिवताप), सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल