शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

अधिकाऱ्याची घोडचूक शेतकऱ्याच्या मुळावर !

By admin | Published: May 17, 2017 12:24 AM

उस्मानाबाद : एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घोडचूक किती महागात पडू शकते, हे कळंब तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांने अनुभवले.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घोडचूक किती महागात पडू शकते, हे कळंब तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांने अनुभवले. तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी नियमांचा चुकीचा अर्थ लावल्याने संबंधित शेतकऱ्याची जमीन सावकाराच्या पाशातून मुक्त होण्यास तब्बल दीड वर्ष विलंब लागला. विभागीय सहनिबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजविल्यानंतर कुठे शेतकऱ्यास न्याय मिळाला. कळंब तालुक्यातील मोहा येथील शमशोद्दीन हशमोद्दीन सय्यद यांनी १८ मार्च २००८ रोजी कळंब येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे अर्ज करून सावकाराच्या ताब्यातील जमीन परत मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल झाले. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेवून सदरील प्रकरण पंधरा वर्षापूर्वीचे असल्याने ते सावकारी अधिनियमात बसत नाही, असे नमूद करीत निर्णय शेतकऱ्याविरूद्ध दिला होता. या अधिकाऱ्याने शेतकऱ्याचा मूळ अर्जाचा (मार्च २०१८) विचारच केला नाही. आपल्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी सय्यद यांनी विभागीय सहनिबंधक, लातूर यांच्याकडे अपील दाखल केले असता, फेरसुनावणी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे यांना दिले. त्यानुसार या प्रकरणात उपनिबंधकांच्या दालनात दहापेक्षा अधिक सुनावण्या झाल्या. परंतु, गैरअर्जदाराने त्यांची बाजू मांडण्याऐवजी वेळोवेळी तांत्रिक मुद्याचा आधार घेत मुदतवाढ मागितली. मुदतवाढीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक वाबळे यांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे मार्गदर्शन मागितले. त्यानुसार २७ एप्रिल २०१७ रोजी मार्गदर्शन प्राप्त झाले असता, गैरअर्जदारास अंतिम युक्तीवाद करण्याची संधी देण्यात आली. परंतु, त्यांनी युक्तीवाद न करता मुदतवाढ मागितली. त्यामुळे उपनिबंधकांनी गैरअर्जदाराची मागणी फेटाळून लावत शेतकऱ्याचा अर्ज मंजूर केला. अवैध सावकारीच्या तारणापोटी गैरअर्जदार लताबाई पुरूषोत्तम तापडे व पुरूषोत्तम रतनलाल तापडे (रा. कळंब) यांनी शेतकरी सय्यद यांच्याकडून सावकारीच्या ओघात तारणापोटी करून घेतलेले खरेदीखत रद्द केले. तसेच जमिनीचा कायदेशीर ताबा संबंधित शेतकऱ्यास देण्याचे आदेश निर्गमित केले.