शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

औरंगाबाद जिल्ह्यात भरड धान्य खरेदीत बारदान्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:38 IST

चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्यूट मिल्स बंद असल्याने निर्माण झाला पेच

ठळक मुद्देकापूस खरेदीचेही त्रांगडेच 

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : मुदत संपायला आली तरी भरडधान्य खरेदीचा मार्ग सुकर होताना दिसत नाही. ३० जून ही भरडधान्य खरेदीची शासनाने दिलेली शेवटची तारीख आहे. बारदाना नसल्याने भरडधान्य खरेदीत अडचण निर्माण झाली आहे. एक तर ही केंद्रेच उशिरा सुरू झाली आणि झाली तरी ती बारदाना नाही म्हणून बंद अवस्थेतच राहिली. याचे जवळचे उदाहरण म्हणजे करमाडचे खरेदी केंद्र.

पश्चिम बंगालला नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाचा फटकाही भरडधान्य खरेदीला बसला. भरडधान्य खरेदीकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्यूट आयुक्त, मुंबईमार्फत नवीन बारदान्याची मागणी केली होती;  परंतु बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. एक तर लाकडाऊन आणि त्यात पश्चिम बंगालला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे बंगालमधील ज्यूट मिल्स बंद आहेत. त्यामुळे तिकडून बारदाना मागवूनही मिळाला नाही आणि नजीकच्या काळातही मिळण्याची शक्यता नाही. मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या ई निविदेसही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेही बारदाना उपलब्ध होऊ शकला नाही. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने आता शेतकऱ्यांकडील बारदान्यामध्ये मका व ज्वारी खरेदी करण्याची  परवानगी दिली आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान्याची  किंमत अदा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्शर्भूमीवर शासनाने प्रथमच रबी हंगामाकरिता भरड धान्य खरेदीचा निर्णय घेतला होता. मुदत संपायच्या आत ही खरेदी होते का, शासनाने परवानगी दिली तरी शेतकरी बारदान्याच्या बाबतीत कसा प्रतिसाद देतात, हे आता पाहावयाचे.

कापूस खरेदीचेही त्रांगडेच राज्यभरातील कापूस उत्पादकांचा कापूस शासन कधी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन कापसाला साडेपाच हजार रुपये इतका हमीभाव देत आहे. खुल्या बाजारात इतका भाव नाही. त्यामुळे यात व्यापारी हात धुऊन घेण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी पथके नियुक्त केली. थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांचा किती कापूस शिल्लक आहे, याचा  अहवाल मागवला होता. हे काम युद्धपातळीवर व्हायला हवे होते; परंतु तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांतील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एक तर लाकडाऊनमुळे कापूस खरेदीला विलंब झाला. त्यामुळे हा कापूस खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यातच हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले आहे. दरम्यान, यंदा पावसानेही उत्तम सुरुवात केली असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, कापूस खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद