शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात भरड धान्य खरेदीत बारदान्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:38 IST

चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्यूट मिल्स बंद असल्याने निर्माण झाला पेच

ठळक मुद्देकापूस खरेदीचेही त्रांगडेच 

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : मुदत संपायला आली तरी भरडधान्य खरेदीचा मार्ग सुकर होताना दिसत नाही. ३० जून ही भरडधान्य खरेदीची शासनाने दिलेली शेवटची तारीख आहे. बारदाना नसल्याने भरडधान्य खरेदीत अडचण निर्माण झाली आहे. एक तर ही केंद्रेच उशिरा सुरू झाली आणि झाली तरी ती बारदाना नाही म्हणून बंद अवस्थेतच राहिली. याचे जवळचे उदाहरण म्हणजे करमाडचे खरेदी केंद्र.

पश्चिम बंगालला नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाचा फटकाही भरडधान्य खरेदीला बसला. भरडधान्य खरेदीकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्यूट आयुक्त, मुंबईमार्फत नवीन बारदान्याची मागणी केली होती;  परंतु बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. एक तर लाकडाऊन आणि त्यात पश्चिम बंगालला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे बंगालमधील ज्यूट मिल्स बंद आहेत. त्यामुळे तिकडून बारदाना मागवूनही मिळाला नाही आणि नजीकच्या काळातही मिळण्याची शक्यता नाही. मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या ई निविदेसही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेही बारदाना उपलब्ध होऊ शकला नाही. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने आता शेतकऱ्यांकडील बारदान्यामध्ये मका व ज्वारी खरेदी करण्याची  परवानगी दिली आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान्याची  किंमत अदा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्शर्भूमीवर शासनाने प्रथमच रबी हंगामाकरिता भरड धान्य खरेदीचा निर्णय घेतला होता. मुदत संपायच्या आत ही खरेदी होते का, शासनाने परवानगी दिली तरी शेतकरी बारदान्याच्या बाबतीत कसा प्रतिसाद देतात, हे आता पाहावयाचे.

कापूस खरेदीचेही त्रांगडेच राज्यभरातील कापूस उत्पादकांचा कापूस शासन कधी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन कापसाला साडेपाच हजार रुपये इतका हमीभाव देत आहे. खुल्या बाजारात इतका भाव नाही. त्यामुळे यात व्यापारी हात धुऊन घेण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी पथके नियुक्त केली. थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांचा किती कापूस शिल्लक आहे, याचा  अहवाल मागवला होता. हे काम युद्धपातळीवर व्हायला हवे होते; परंतु तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांतील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एक तर लाकडाऊनमुळे कापूस खरेदीला विलंब झाला. त्यामुळे हा कापूस खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यातच हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले आहे. दरम्यान, यंदा पावसानेही उत्तम सुरुवात केली असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, कापूस खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद