शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

औरंगाबाद जिल्ह्यात भरड धान्य खरेदीत बारदान्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:38 IST

चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्यूट मिल्स बंद असल्याने निर्माण झाला पेच

ठळक मुद्देकापूस खरेदीचेही त्रांगडेच 

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : मुदत संपायला आली तरी भरडधान्य खरेदीचा मार्ग सुकर होताना दिसत नाही. ३० जून ही भरडधान्य खरेदीची शासनाने दिलेली शेवटची तारीख आहे. बारदाना नसल्याने भरडधान्य खरेदीत अडचण निर्माण झाली आहे. एक तर ही केंद्रेच उशिरा सुरू झाली आणि झाली तरी ती बारदाना नाही म्हणून बंद अवस्थेतच राहिली. याचे जवळचे उदाहरण म्हणजे करमाडचे खरेदी केंद्र.

पश्चिम बंगालला नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाचा फटकाही भरडधान्य खरेदीला बसला. भरडधान्य खरेदीकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्यूट आयुक्त, मुंबईमार्फत नवीन बारदान्याची मागणी केली होती;  परंतु बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. एक तर लाकडाऊन आणि त्यात पश्चिम बंगालला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे बंगालमधील ज्यूट मिल्स बंद आहेत. त्यामुळे तिकडून बारदाना मागवूनही मिळाला नाही आणि नजीकच्या काळातही मिळण्याची शक्यता नाही. मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या ई निविदेसही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेही बारदाना उपलब्ध होऊ शकला नाही. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने आता शेतकऱ्यांकडील बारदान्यामध्ये मका व ज्वारी खरेदी करण्याची  परवानगी दिली आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान्याची  किंमत अदा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्शर्भूमीवर शासनाने प्रथमच रबी हंगामाकरिता भरड धान्य खरेदीचा निर्णय घेतला होता. मुदत संपायच्या आत ही खरेदी होते का, शासनाने परवानगी दिली तरी शेतकरी बारदान्याच्या बाबतीत कसा प्रतिसाद देतात, हे आता पाहावयाचे.

कापूस खरेदीचेही त्रांगडेच राज्यभरातील कापूस उत्पादकांचा कापूस शासन कधी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन कापसाला साडेपाच हजार रुपये इतका हमीभाव देत आहे. खुल्या बाजारात इतका भाव नाही. त्यामुळे यात व्यापारी हात धुऊन घेण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी पथके नियुक्त केली. थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांचा किती कापूस शिल्लक आहे, याचा  अहवाल मागवला होता. हे काम युद्धपातळीवर व्हायला हवे होते; परंतु तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांतील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एक तर लाकडाऊनमुळे कापूस खरेदीला विलंब झाला. त्यामुळे हा कापूस खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यातच हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले आहे. दरम्यान, यंदा पावसानेही उत्तम सुरुवात केली असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, कापूस खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद