शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
3
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
4
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
5
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
6
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
7
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
8
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
9
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
10
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
11
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
12
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
13
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
14
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
16
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
17
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
18
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
19
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
20
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव

पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे असतात, तेवढी यंदा एका औरंगाबाद जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:03 IST

तयारी परीक्षेची : केंद्रप्रमुखांना परीक्षेच्यावेळी काळजी घेण्याच्या मंडळाच्या सूचना --- औरंगाबाद : दरवर्षी पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे ...

तयारी परीक्षेची : केंद्रप्रमुखांना परीक्षेच्यावेळी काळजी घेण्याच्या मंडळाच्या सूचना

---

औरंगाबाद : दरवर्षी पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे असतात, त्यापेक्षा अधिक ठिकाणी यावर्षी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा होणार आहे. यात बोर्डासह शिक्षण विभागाचा कस लागणार आहे.

अनेक शाळा, महाविद्यालयांत दहावी, बारावीचे प्रवेशित विद्यार्थी आहेत. मात्र, त्या शाळांत बसण्याची व्यवस्था व इतर सुविधा योग्य नसल्याने अशा शाळांनी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. अशा शाळा, महाविद्यालयांच्या एकत्रिकरणाचे काम सध्या सुरू आहे. बोर्डाचे केंद्र त्याअंतर्गत उपकेंद्र परीक्षांचे नियोजन सांभाळतील. त्या उपकेंद्राचे प्रमुख, तालुकास्तरावर परिरक्षक आदींचे नियोजन शिक्षण विभाग करतोय. याशिवाय प्रश्नसंच, उत्तरपत्रिका वितरण व संकलनाचे नियोजन सध्या सुरू आहे. अशी माहिती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेवर कोरोनाचे सावट असल्याने, विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून तयारी सुरू आहे. परीक्षेसंदर्भातील नियोजनाच्या राज्य मंडळाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचना केंद्रप्रमुखांना लेखी स्वरूपात पाठविण्यात आल्या आहेत. कोराेनामुळे प्रत्यक्ष बैठक घेऊन सूचना देणे शक्य नसल्याने ऑनलाईन बैठक घेऊन माहिती देण्यात येणार असल्याचे पुन्ने म्हणाल्या.

राज्य मंडळाच्या सूचनांनुसार सर्व तयारी झाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल. एका बाकावर एक, तर नागमोडी वळणाने बैठक व्यवस्था असेल, असेही त्यांनी सांगितले.

--

ग्रामीणमध्ये ५०, तर शहरात १०० विद्यार्थ्यांचे उपकेंद्र

--

कुठे ३३, तर कुठे २ ते ३ प्रवेश, तर कुठे प्रवेशाएवढी बैठक व्यवस्था नाही. कमी विद्यार्थी असल्याने प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेणे बोर्डाला परवडणारे नाही. तसेच शक्यही होणार नाही. त्यामुळे १४ एप्रिलपूर्वी ग्रामीणमध्ये ५०, तर शहरात १०० विद्यार्थी तिथे उपकेंद्र नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राकडून उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका पुरवठा व संकलन केले जाईल, असे पुन्ने म्हणाल्या.

---

दहावीची ६६२, तर बारावीची ५७२ केंद्रे

---

दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी जिल्ह्यात केंद्रांसह उपकेंद्रांची निश्चिती प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू आहे. विद्यार्थी ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकतात, तिथेच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. याविषयी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी चव्हाण म्हणाले, अद्याप अंतिम केंद्रनिश्चिती झाली नसली तरी, संभाव्य ६६२ शाळांत दहावीची, तर ५७२ शाळा, महाविद्यालयांत बारावीची परीक्षा घेण्यासंबंधी नियोजन सुरू आहे.

---

६५,०११

दहावीचे विद्यार्थी

--

५५,१७७

बारावीचे विद्यार्थी