शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे असतात, तेवढी यंदा एका औरंगाबाद जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:03 IST

तयारी परीक्षेची : केंद्रप्रमुखांना परीक्षेच्यावेळी काळजी घेण्याच्या मंडळाच्या सूचना --- औरंगाबाद : दरवर्षी पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे ...

तयारी परीक्षेची : केंद्रप्रमुखांना परीक्षेच्यावेळी काळजी घेण्याच्या मंडळाच्या सूचना

---

औरंगाबाद : दरवर्षी पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे असतात, त्यापेक्षा अधिक ठिकाणी यावर्षी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा होणार आहे. यात बोर्डासह शिक्षण विभागाचा कस लागणार आहे.

अनेक शाळा, महाविद्यालयांत दहावी, बारावीचे प्रवेशित विद्यार्थी आहेत. मात्र, त्या शाळांत बसण्याची व्यवस्था व इतर सुविधा योग्य नसल्याने अशा शाळांनी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. अशा शाळा, महाविद्यालयांच्या एकत्रिकरणाचे काम सध्या सुरू आहे. बोर्डाचे केंद्र त्याअंतर्गत उपकेंद्र परीक्षांचे नियोजन सांभाळतील. त्या उपकेंद्राचे प्रमुख, तालुकास्तरावर परिरक्षक आदींचे नियोजन शिक्षण विभाग करतोय. याशिवाय प्रश्नसंच, उत्तरपत्रिका वितरण व संकलनाचे नियोजन सध्या सुरू आहे. अशी माहिती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेवर कोरोनाचे सावट असल्याने, विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून तयारी सुरू आहे. परीक्षेसंदर्भातील नियोजनाच्या राज्य मंडळाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचना केंद्रप्रमुखांना लेखी स्वरूपात पाठविण्यात आल्या आहेत. कोराेनामुळे प्रत्यक्ष बैठक घेऊन सूचना देणे शक्य नसल्याने ऑनलाईन बैठक घेऊन माहिती देण्यात येणार असल्याचे पुन्ने म्हणाल्या.

राज्य मंडळाच्या सूचनांनुसार सर्व तयारी झाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल. एका बाकावर एक, तर नागमोडी वळणाने बैठक व्यवस्था असेल, असेही त्यांनी सांगितले.

--

ग्रामीणमध्ये ५०, तर शहरात १०० विद्यार्थ्यांचे उपकेंद्र

--

कुठे ३३, तर कुठे २ ते ३ प्रवेश, तर कुठे प्रवेशाएवढी बैठक व्यवस्था नाही. कमी विद्यार्थी असल्याने प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेणे बोर्डाला परवडणारे नाही. तसेच शक्यही होणार नाही. त्यामुळे १४ एप्रिलपूर्वी ग्रामीणमध्ये ५०, तर शहरात १०० विद्यार्थी तिथे उपकेंद्र नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राकडून उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका पुरवठा व संकलन केले जाईल, असे पुन्ने म्हणाल्या.

---

दहावीची ६६२, तर बारावीची ५७२ केंद्रे

---

दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी जिल्ह्यात केंद्रांसह उपकेंद्रांची निश्चिती प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू आहे. विद्यार्थी ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकतात, तिथेच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. याविषयी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी चव्हाण म्हणाले, अद्याप अंतिम केंद्रनिश्चिती झाली नसली तरी, संभाव्य ६६२ शाळांत दहावीची, तर ५७२ शाळा, महाविद्यालयांत बारावीची परीक्षा घेण्यासंबंधी नियोजन सुरू आहे.

---

६५,०११

दहावीचे विद्यार्थी

--

५५,१७७

बारावीचे विद्यार्थी