शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

आता भाज्यांनीही गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:14 IST

महागाईचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असून डाळीनंतर आता दोडके, फुलकोबी, गवार या फळभाज्यांचे दर  १०० रूपयांच्याही पुढे गेले आहेत.

औरंगाबाद : महागाईचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असून डाळीनंतर आता दोडके, फुलकोबी, गवार या फळभाज्यांचे दर  १०० रूपयांच्याही पुढे गेले आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतातच भाज्या खराब होत असून आवक कमी झाली आहे. जाधव वाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात निम्म्याने भाज्यांची आवक घटली आहे. औरंगपुरा भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांकडील भाज्यांच्या टोपल्या रिकाम्या दिसत आहेत. 

आवक घटल्याने भाज्यांचे भाव मागील १० दिवसांत किलोमागे २० ते ३० रूपयांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात ६० ते ८० रूपये किलोने विक्री होणारे दोडके, फुलकोबी, गवार शेंगा, चवळी आता ८० ते १०० रूपयांना मिळत आहे. २० ते ३० रूपयांना मिळणारी पत्ताकोबी ५० ते ६०  रूपयांना विकली  जात आहे. भेंडी व गाजराचे भाव ८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. लवंगी मिरची ६० ते ८० रूपये, काकडा मिरची १०० ते १२०  रूपचे किलो झाली आहे. फक्त टोमेटोची आवक वाढल्याने ते २० ते ३० रूपयांनी कमी होऊन ४० ते ५० रूपये किलो या दराने मिळत आहेत.

टॅग्स :MarketबाजारInflationमहागाईvegetableभाज्या