शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

By विजय सरवदे | Updated: October 27, 2023 13:59 IST

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी साधारणपणे १५ ऑक्टोबरपासूनच कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडविण्यासाठी गेट टाकले जातात. मात्र, यंदा जिल्ह्यातील तब्बल ८० टक्के बंधारे कोरडेठाक आहेत. तथापि, परतीचा पाऊस झाल्यास त्या पाण्याचा रब्बी हंगामात सिंचनासाठी थोडासा का होईना फायदा होईल, या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंमाम तर गेलाच, आता रब्बीचे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अल्प पावासामुळे बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही कोरडेच आहेत. वास्तविक, साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून गेट टाकून कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वाहते पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता बंधाऱ्यांतच पाणी नाही, तर गेट टाकून फायदा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे हे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र, कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी अनेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले. त्यामुळे यापूर्वी अनेक वर्षे गेटअभावी बंधाऱ्यांतील पाणी वाहून जात असे. सद्य:स्थितीत ५८५ बंधाऱ्यांसाठी साधारणपणे १८ हजार गेटची गरज असून, सिंचन विभागाकडे सुमारे १५ हजार गेट उपलब्ध आहेत. उर्वरित २७०० नवीन गेट तयार करून ते बंधाऱ्यांना बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार पुरवठादारांनी बंधाऱ्यांच्या ठिकाणी गेट उपलब्ध करून दिले आहेत. काही गेट टाकले; पण अनेक गेट टाकलेले नाहीत.

१५ ते २० टक्के बंधाऱ्यांत पाणीवरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे त्या परिसरातील बंधाऱ्यांमध्ये थोडेफार पाणी आहे. तेथील बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविण्यात यश आले आहे; पण छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील बंधारे कोरडेठाक आहेत. जिल्ह्यातील अवघ्या १५ ते २० टक्के बंधाऱ्यांमध्ये थोडेफार पाणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी