शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आता सिनेमागृहात घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ; १५ दिवसांत सिनेमागृहात लागणार फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:01 IST

खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सिनेमागृहात मज्जाव करण्यात येत असेल, तर ते कायद्याने गैर आहे, यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी केले. 

औरंगाबाद : सिनेमागृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, तसेच पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी जाताना ते पदार्थ घेऊन गेल्यास ग्राहकांनी आवाज उठवावा. कारण ते अन्न व पाणी आहे, स्फोटक पदार्थ नाहीत. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सिनेमागृहात मज्जाव करण्यात येत असेल, तर ते कायद्याने गैर आहे, यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी केले. 

अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या तेथील सुरक्षारक्षकाला ग्राहकहिताचे कायदे माहिती नसतात. घरातील पदार्थ नेण्यासाठी त्याने विरोध केल्यास सिनेमा सोडून देत त्या सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाविरोधात थेट पुरवठा अधिका-यांकडे येऊन त्यासंबंधी तक्रार द्या, असे आवाहनही देशपांडे यांनी केले. ग्राहकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजेत, असे सांगत देशपांडे म्हणाले, ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आली आहे, सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, तसेच पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच, सिनेमागृहातील सुरक्षारक्षकाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून घेऊन गेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केली, तर त्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्याकडे तक्रार करावी, तसेच ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत आहे, अतिरिक्त शुल्क, खराब प्रतीचा माल, सेवा मिळत असेल त्याठिकाणी त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अवगत करता येईल, असेही देशपांडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक जागरण पंधरवड्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर देशपांडे यांनी पत्रकारांशी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती दिली.

सिनेमागृहांना प्रतिबंध करता येणार नाहीसिनेमागृहात प्रेक्षकांनी स्वत:जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ (पोळीभाजी व इतर पदार्थ) तेथील व्यवस्थापनाला प्रतिबंध करता येणार नाही, असे करणे कायद्याने गैर आहे असे सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक सिनेमागृहात आलेल्या प्रेक्षकांना दिसतील अशा ठिकाणी लावण्यात येणार आहेत, असे देशपांडे यांनी सांगितले.

ग्राहक जागरण पंधरवडा१५ ते ३१ डिसेंबरदरम्यान ग्राहक जागरण पंधरवडा घेण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती समजेल अशा शब्दांत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रदर्शन, भित्तीपत्रक, परिसंवाद, मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्राहक हक्कांबाबत माहिती, निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना देशपांडे यांनी केल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद