शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 19:06 IST

'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक, चिंता करू नये, तज्ज्ञचे आवाहन 

औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात सारी'चे (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) संकट वाढत आहे. कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण आढळून येत आहे. तर 'सारी'च्या रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 'सारी'ची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे 'सारी'ऐवजी न्यूमोनिया पुढे केला जात आहे.

सध्या कोरोनाबरोबरच 'सारी'च्या रुग्णांचे वाढते प्रमाण चिंतादायक ठरत आहे. शहरात पहिल्यांदा २४ मार्च रोजी कोरोनासदृश्य सारीने एकाचा मृत्यू झाल्याचे समोरे आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

राज्य सरकारसह केंद्र सरकारपर्यंत 'सारी'ची माहिती पोहोचली. शहरात आतापर्यंत 'सारी'च्या १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल घेत कोरोना , सारी तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः सारीसाठी १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र स्थापन केले आहेत. मात्र, 'सारी'च्या रुग्णसंख्येत रोज भर पडत आहे. त्याच्या वाढत्या प्रमाणाने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे 'सारी' ऐवजी आता न्यूमोनिया पुढे केला जात आहे. 'सारी'ऐवजी न्यूमोनिया रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांचेही स्वब तापणीसाठी घेतले जात आहेत. अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात उशिरा येतात. ही बाबही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

१७७ जण निगेटिव्ह शहरात १५ एप्रिलपर्यत सारीचे २०० रुग्ण समोर आले होते. यात १७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. यात घाटीत दाखल ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. 'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चिंता करू नये, असे आवाहन तज्ज्ञनी केले.

वेळीच उपचार घ्यावे

अनेक रुग्ण वेळीच उपचार घेत नाही. गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात उशीराने दाखल होतात. मात्र, वेळीच उपचार घेण्याची गरज आहे. 'सारी'च्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधीक आहे.

- डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसीन, घाटी

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादmedicineऔषधं