शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 19:06 IST

'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक, चिंता करू नये, तज्ज्ञचे आवाहन 

औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात सारी'चे (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) संकट वाढत आहे. कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण आढळून येत आहे. तर 'सारी'च्या रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 'सारी'ची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे 'सारी'ऐवजी न्यूमोनिया पुढे केला जात आहे.

सध्या कोरोनाबरोबरच 'सारी'च्या रुग्णांचे वाढते प्रमाण चिंतादायक ठरत आहे. शहरात पहिल्यांदा २४ मार्च रोजी कोरोनासदृश्य सारीने एकाचा मृत्यू झाल्याचे समोरे आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

राज्य सरकारसह केंद्र सरकारपर्यंत 'सारी'ची माहिती पोहोचली. शहरात आतापर्यंत 'सारी'च्या १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल घेत कोरोना , सारी तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः सारीसाठी १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र स्थापन केले आहेत. मात्र, 'सारी'च्या रुग्णसंख्येत रोज भर पडत आहे. त्याच्या वाढत्या प्रमाणाने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे 'सारी' ऐवजी आता न्यूमोनिया पुढे केला जात आहे. 'सारी'ऐवजी न्यूमोनिया रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांचेही स्वब तापणीसाठी घेतले जात आहेत. अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात उशिरा येतात. ही बाबही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

१७७ जण निगेटिव्ह शहरात १५ एप्रिलपर्यत सारीचे २०० रुग्ण समोर आले होते. यात १७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. यात घाटीत दाखल ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. 'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चिंता करू नये, असे आवाहन तज्ज्ञनी केले.

वेळीच उपचार घ्यावे

अनेक रुग्ण वेळीच उपचार घेत नाही. गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात उशीराने दाखल होतात. मात्र, वेळीच उपचार घेण्याची गरज आहे. 'सारी'च्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधीक आहे.

- डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसीन, घाटी

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादmedicineऔषधं