शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! औरंगाबादेत एक लाखावर अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 01:20 IST

गळती आणि चोरीही मोठी : सर्वाधिक पाणीपट्टी भरणाऱ्या शहराला पुरवठा मात्र तोकडा; उपलब्ध असूनही पाच दिवसांआड मिळते पाणी

- ऋचिका पालोदकरऔरंगाबाद : राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरणाºया औरंगाबादकरांना पाणी मात्र कमीच मिळते. शहरात अनधिकृत नळांची संख्या जवळपास एक लाखावर असून, पाण्याची गळती तब्बल १० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यामुळे पाणीपट्टीचे दर वाढविण्याआधी या दोन प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.औरंगाबादमध्ये पाणीपट्टीचा दर वर्षाला ४०५० रुपये एवढा असून, तो पुणे- मुंबईपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाते. पाणीपट्टी एवढी जास्त असूनही राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादचा पाणीपुरवठा मात्र अगदीच तोकडा आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात असून, दररोज शहराला २५० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. यापैकी जायकवाडी धरणातून शहराला १३० दशलक्ष घनमीटर पाणी मिळते. मुख्य पाईपलाईनला अनेक ठिकाणी असलेल्या गळतीमुळे १० दशलक्ष घनमीटर पाण्यावर औरंगाबादकरांना दररोज पाणी सोडावे लागते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेला दरवर्षी अंदाजे ६० कोटी रुपये एवढा खर्च करावा लागतो. शहरातील अधिकृत नळांची कागदोपत्री संख्या १ लाख ३० हजार असली तरी शहरात १ लाखापेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, तसेच शहराची थकीत पाणीपट्टी ४०० कोटींच्या घरात आहे. पाच दिवसांआड पाणी मिळणारे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे सर्वसामान्य औरंगाबादकर पाण्याची किंमत चांगलीच जाणतात. त्याचवेळी अवैध नळ कनेक्शन घेऊन खुलेआम पाणीचोरी करणारे आणि वरून दमदाटी करणाऱ्यांची संख्याही येथे कमी नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढविण्याआधी ही गळती आणि अवैध नळकनेक्शनवर अंकुश आणला जावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.आधी पाणीपुरवठा यंत्रणा प्रभावी करा : औरंगाबाद शहरातील ५० टक्के नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आणि दमदाटी करून पाणी घेणाºयांना पाणीदरवाढ लागूच होत नाही. तुम्ही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करू शकत नाही, त्यांच्याविरुद्ध तुम्ही कायदा वापरत नाही. कोणी अधिकारी त्यांच्याविरुद्ध उभा राहिलाच, तर अन्य लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत, लगेच त्या प्रकरणावर स्टे आणला जातो. मग पाणीदरवाढ करून उपयोग काय? मुळात पाणीपुरवठा करणारी आपल्या देशातील यंत्रणा प्रभावी नाही. पाण्याचे कोणतेही मोजमाप होत नाही. याची एक योग्य पद्धत जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत पाणीदरात वाढ करून उपयोग नाही. -डॉ. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञलोकांमध्ये जागृती वाढणे गरजेचे : १० दशलक्ष घनमीटर पाणी दररोज वाया जाते, असे म्हणता येणार नाही. कारण हा ‘अझ्युम लॉस किंवा टेक्निकल लॉस’ म्हणून गृहीत धरण्यात येतो. जेवढी लांब पाईपलाईन असेल, तेवढा हा लॉस जास्त गृहीत धरतात. पाणीचोरी, अनधिकृत नळ कनेक्शन घेणाºयांवर आम्ही कायम कारवाई करीतच असतो. अनेकदा पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करतो; पण जोपर्यंत यामध्ये लोकसहभाग असणार नाही, तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहतील. आपल्या बाजूचा माणूस जर अवैध पद्धतीने नळ घेत असेल, तर ही गोष्ट नगरसेवक, मनपा कर्मचाºयांपर्यंत कळविणे, हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे; पण या विरुद्ध कोणीही बोलत नाही. हा प्रश्न एकट्या प्रशासनाचा नसून सामाजिक प्रश्न आहे. - हेमंत क ोल्हे, कार्यकारी अभियंता, मनपाऔरंगाबाद शहराची लोकसंख्या 17,00,000थकीत पाणीपट्टी 400 कोटीअधिकृत नळांची कागदोपत्री संख्या 1,30,000पाण्याची शहराला आवश्यकता आहे. 250 दशलक्ष घ.मी.पाणी शहराला जायकवाडी धरणातून मिळते 130 दशलक्ष घ.मी.पाण्याची गळती 10 दशलक्ष घ.मी.