शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता आरक्षणासाठी मुस्लिम बांधवही रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:31 IST

३ आॅगस्टपासून मुस्लिम बांधवही रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी जनजागरण समितीने एका पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे आरक्षणासाठी महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीवर राज्यभर ऐतिहासिक मोर्चे काढण्यात आले त्यानंतर न्यायालयामार्फत ५ टक्के विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले. विद्यमान सेना-भाजप युतीचे सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही.

औरंगाबाद : शैक्षणिक प्रवाहात मुस्लिम बांधवही पुढे यावेत म्हणून न्यायालयाने मुस्लिम विद्यार्थ्यांना ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासन आरक्षण देत नसल्याने ३ आॅगस्टपासून मुस्लिम बांधवही रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी जनजागरण समितीने एका पत्रकार परिषदेत केली. मराठा, धनगर बांधवांनाही न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीवर राज्यभर ऐतिहासिक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर न्यायालयामार्फत ५ टक्के विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले. विद्यमान सेना-भाजप युतीचे सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. आरक्षण नसल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी मागे पडत आहेत. आयुष्यभर या विद्यार्थ्यांनी वडा-पावच विकत बसावा अशी सरकारची इच्छा आहे का, असा संतप्त सवालही यावेळी करण्यात आला. लोकशाही मार्गाने आम्ही हक्क मिळविण्यासाठी सर्व काही करणार आहोत. आमच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला अजिबात परवडणार नाही. मुस्लिमांच्या आरक्षणाकडे शासनाने अजूनही गांभीर्याने विचार करावा. एक आठवड्याचा अवधी आम्ही सरकारला देत आहोत. ‘सब का साथ सबका विकास’म्हणणाऱ्या सरकारने मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण जाहीर करून दाखवावे. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक तथा समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद, मुस्लिम अवामी कमिटीचे अध्यक्ष इलियास किरमानी, माजी महापौर रशीदमामू, माजी नगरसेवक इब्राहीमभय्या पटेल, शेख मुनाफ, इसाक अंडेवाला, आबेदा बेगम, मोहसीना बिलखीस, अन्वर शेर खान, अ‍ॅड. सय्यद अक्रम, महेफुज-उर -रहेमान, डॉ. शमीम आदींची उपस्थिती होती.

असे राहणार आंदोलन३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. ९ आणि १० आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर व्यापक आंदोलन होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मुंडन आंदोलन, बेमुदत उपोषण, जिल्हा, तहसील स्तरापर्यंत आंदोलन नेण्यात येणार आहे. सरकारने आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर रोषमुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मौन बाळगून आहेत. ७० वर्षांपासून मुस्लिम मतांवर राज्य करणाऱ्या मंडळींसाठी ही बाब अशोभनीय आहे. मुस्लिम समाजालाही न्याय मिळावा म्हणून त्यांनी अजिबात प्रयत्न केलेले नाहीत. शहरातील तरुणांनी आपल्या रक्ताने लिहिलेली तक्रार राहुल गांधी, शरद पवार यांच्याकडे पाठविण्यात येत आहे.

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीमagitationआंदोलन