शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आता आरक्षणासाठी मुस्लिम बांधवही रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:31 IST

३ आॅगस्टपासून मुस्लिम बांधवही रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी जनजागरण समितीने एका पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे आरक्षणासाठी महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीवर राज्यभर ऐतिहासिक मोर्चे काढण्यात आले त्यानंतर न्यायालयामार्फत ५ टक्के विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले. विद्यमान सेना-भाजप युतीचे सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही.

औरंगाबाद : शैक्षणिक प्रवाहात मुस्लिम बांधवही पुढे यावेत म्हणून न्यायालयाने मुस्लिम विद्यार्थ्यांना ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासन आरक्षण देत नसल्याने ३ आॅगस्टपासून मुस्लिम बांधवही रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी जनजागरण समितीने एका पत्रकार परिषदेत केली. मराठा, धनगर बांधवांनाही न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीवर राज्यभर ऐतिहासिक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर न्यायालयामार्फत ५ टक्के विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले. विद्यमान सेना-भाजप युतीचे सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. आरक्षण नसल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी मागे पडत आहेत. आयुष्यभर या विद्यार्थ्यांनी वडा-पावच विकत बसावा अशी सरकारची इच्छा आहे का, असा संतप्त सवालही यावेळी करण्यात आला. लोकशाही मार्गाने आम्ही हक्क मिळविण्यासाठी सर्व काही करणार आहोत. आमच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला अजिबात परवडणार नाही. मुस्लिमांच्या आरक्षणाकडे शासनाने अजूनही गांभीर्याने विचार करावा. एक आठवड्याचा अवधी आम्ही सरकारला देत आहोत. ‘सब का साथ सबका विकास’म्हणणाऱ्या सरकारने मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण जाहीर करून दाखवावे. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक तथा समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद, मुस्लिम अवामी कमिटीचे अध्यक्ष इलियास किरमानी, माजी महापौर रशीदमामू, माजी नगरसेवक इब्राहीमभय्या पटेल, शेख मुनाफ, इसाक अंडेवाला, आबेदा बेगम, मोहसीना बिलखीस, अन्वर शेर खान, अ‍ॅड. सय्यद अक्रम, महेफुज-उर -रहेमान, डॉ. शमीम आदींची उपस्थिती होती.

असे राहणार आंदोलन३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. ९ आणि १० आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर व्यापक आंदोलन होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मुंडन आंदोलन, बेमुदत उपोषण, जिल्हा, तहसील स्तरापर्यंत आंदोलन नेण्यात येणार आहे. सरकारने आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर रोषमुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मौन बाळगून आहेत. ७० वर्षांपासून मुस्लिम मतांवर राज्य करणाऱ्या मंडळींसाठी ही बाब अशोभनीय आहे. मुस्लिम समाजालाही न्याय मिळावा म्हणून त्यांनी अजिबात प्रयत्न केलेले नाहीत. शहरातील तरुणांनी आपल्या रक्ताने लिहिलेली तक्रार राहुल गांधी, शरद पवार यांच्याकडे पाठविण्यात येत आहे.

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीमagitationआंदोलन