शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

आता मनाचे लॉकडाऊन गरजेचे; सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:04 IST

रविवारपासून ३१ जुलैपर्यंत होणार पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंमलबजावणी

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीची९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलत

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नऊ दिवसांची शहर आणि वाळूज परिसरात लागू केलेली संचारबंदी १८ जुलैच्या मध्यरात्री मागे घेतली जाणार आहे. १९ जुलै रोजी पहाटेपासून औरंगाबाद शहर आणि सर्व औद्योगिक परिसराची दैनंदिनी रुळावर येणार असून, पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

१९ जुलैपासून शहर व उद्योगांची दैनंदिनी कशी असेल, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे शनिवारी देणार आहे. मोकळ्या जागेतील वावर, सलून, ब्युटीपार्लर, सार्वजनिक बससेवा, सर्व किराणा दुकाने, सर्व प्रकारची बांधकामे, होम डिलिव्हरी सेवा यांना ९ जुलैपूर्वी जसे नियम होते ते नियम कायम राहणार आहेत. भाजीमार्केट, फळविक्रेते याबाबत आणि दुचाकी, तीनचाकी व चारचाकी रस्त्यावर फिरू देण्याबाबत शनिवारी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांचे वितरण, डिजिटल, प्रिंट मीडिया कार्यालये सुरूच राहतील.दूध वितरणही सुरूच राहील. रविवारपासून सर्व पेट्रोलपंप सामान्यांसाठी सुरू होतील.

आता मनाचे लॉकडाऊन पाळावेविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, मास्क लावणे, हात धुणे हे नागरिकांनी पाळावे. उद्योजकांनी आणि मोठ्या उद्योग, आस्थापनांना रविवारपासून व्हायरस पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वांना वागणे बदलावे लागेल. नियम पाळले नाही, तर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल. १८ जुलैनंतर लॉकडाऊन वाढणार नाही. आता मनाचा लॉकडाऊन प्रत्येकाने पाळावा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

याबाबत राहू शकतो ‘जैसे थे’ निर्णय आठवडी बाजार, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग, प्रवासी वाहने, खासगी बससेवा, वाहतूक वाहने, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्य, प्रेक्षागृह, सभागृह, मंगल कार्यालये, लग्न समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, प्रार्थना स्थळांबाबत निर्णय ‘जैसे थे’ राहणे शक्य आहे. ३१ जुलैनंतर याबाबत शासन निर्णय घेईल. 

९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलतजिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, मनपा आयुक्तांनी शहराकरिता ९ ते १८ जुलैपर्यंत प्रतिबंध घातले होते, म्हणजे १८ जुलै रोजी त्यांनी घातलेले प्रतिबंध संपुष्टात येतील. ९ जुलैपूर्वी ज्या पद्धतीने सवलतींसह लॉकडाऊन सुरू होते, तीच परिस्थिती १९ जुलैपासून कायम होईल. पोलीस आयुक्तांकडून देखील असेच निर्णय असतील. सम-विषमबाबत शनिवारी निर्णय होईल. शासनाचे आदेश असल्यामुळे सम-विषम कायम राहील.

व्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीचीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला. भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल, त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद