शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आता मनाचे लॉकडाऊन गरजेचे; सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:04 IST

रविवारपासून ३१ जुलैपर्यंत होणार पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंमलबजावणी

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीची९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलत

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नऊ दिवसांची शहर आणि वाळूज परिसरात लागू केलेली संचारबंदी १८ जुलैच्या मध्यरात्री मागे घेतली जाणार आहे. १९ जुलै रोजी पहाटेपासून औरंगाबाद शहर आणि सर्व औद्योगिक परिसराची दैनंदिनी रुळावर येणार असून, पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

१९ जुलैपासून शहर व उद्योगांची दैनंदिनी कशी असेल, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे शनिवारी देणार आहे. मोकळ्या जागेतील वावर, सलून, ब्युटीपार्लर, सार्वजनिक बससेवा, सर्व किराणा दुकाने, सर्व प्रकारची बांधकामे, होम डिलिव्हरी सेवा यांना ९ जुलैपूर्वी जसे नियम होते ते नियम कायम राहणार आहेत. भाजीमार्केट, फळविक्रेते याबाबत आणि दुचाकी, तीनचाकी व चारचाकी रस्त्यावर फिरू देण्याबाबत शनिवारी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांचे वितरण, डिजिटल, प्रिंट मीडिया कार्यालये सुरूच राहतील.दूध वितरणही सुरूच राहील. रविवारपासून सर्व पेट्रोलपंप सामान्यांसाठी सुरू होतील.

आता मनाचे लॉकडाऊन पाळावेविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, मास्क लावणे, हात धुणे हे नागरिकांनी पाळावे. उद्योजकांनी आणि मोठ्या उद्योग, आस्थापनांना रविवारपासून व्हायरस पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वांना वागणे बदलावे लागेल. नियम पाळले नाही, तर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल. १८ जुलैनंतर लॉकडाऊन वाढणार नाही. आता मनाचा लॉकडाऊन प्रत्येकाने पाळावा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

याबाबत राहू शकतो ‘जैसे थे’ निर्णय आठवडी बाजार, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग, प्रवासी वाहने, खासगी बससेवा, वाहतूक वाहने, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्य, प्रेक्षागृह, सभागृह, मंगल कार्यालये, लग्न समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, प्रार्थना स्थळांबाबत निर्णय ‘जैसे थे’ राहणे शक्य आहे. ३१ जुलैनंतर याबाबत शासन निर्णय घेईल. 

९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलतजिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, मनपा आयुक्तांनी शहराकरिता ९ ते १८ जुलैपर्यंत प्रतिबंध घातले होते, म्हणजे १८ जुलै रोजी त्यांनी घातलेले प्रतिबंध संपुष्टात येतील. ९ जुलैपूर्वी ज्या पद्धतीने सवलतींसह लॉकडाऊन सुरू होते, तीच परिस्थिती १९ जुलैपासून कायम होईल. पोलीस आयुक्तांकडून देखील असेच निर्णय असतील. सम-विषमबाबत शनिवारी निर्णय होईल. शासनाचे आदेश असल्यामुळे सम-विषम कायम राहील.

व्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीचीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला. भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल, त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद