शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

आता मनाचे लॉकडाऊन गरजेचे; सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:04 IST

रविवारपासून ३१ जुलैपर्यंत होणार पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंमलबजावणी

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीची९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलत

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नऊ दिवसांची शहर आणि वाळूज परिसरात लागू केलेली संचारबंदी १८ जुलैच्या मध्यरात्री मागे घेतली जाणार आहे. १९ जुलै रोजी पहाटेपासून औरंगाबाद शहर आणि सर्व औद्योगिक परिसराची दैनंदिनी रुळावर येणार असून, पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सम-विषम पद्धतीनेच बाजारपेठा सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

१९ जुलैपासून शहर व उद्योगांची दैनंदिनी कशी असेल, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे शनिवारी देणार आहे. मोकळ्या जागेतील वावर, सलून, ब्युटीपार्लर, सार्वजनिक बससेवा, सर्व किराणा दुकाने, सर्व प्रकारची बांधकामे, होम डिलिव्हरी सेवा यांना ९ जुलैपूर्वी जसे नियम होते ते नियम कायम राहणार आहेत. भाजीमार्केट, फळविक्रेते याबाबत आणि दुचाकी, तीनचाकी व चारचाकी रस्त्यावर फिरू देण्याबाबत शनिवारी स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांचे वितरण, डिजिटल, प्रिंट मीडिया कार्यालये सुरूच राहतील.दूध वितरणही सुरूच राहील. रविवारपासून सर्व पेट्रोलपंप सामान्यांसाठी सुरू होतील.

आता मनाचे लॉकडाऊन पाळावेविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, सोशल डिस्टन्सिंंग पाळणे, मास्क लावणे, हात धुणे हे नागरिकांनी पाळावे. उद्योजकांनी आणि मोठ्या उद्योग, आस्थापनांना रविवारपासून व्हायरस पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वांना वागणे बदलावे लागेल. नियम पाळले नाही, तर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल. १८ जुलैनंतर लॉकडाऊन वाढणार नाही. आता मनाचा लॉकडाऊन प्रत्येकाने पाळावा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

याबाबत राहू शकतो ‘जैसे थे’ निर्णय आठवडी बाजार, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग, प्रवासी वाहने, खासगी बससेवा, वाहतूक वाहने, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्य, प्रेक्षागृह, सभागृह, मंगल कार्यालये, लग्न समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, प्रार्थना स्थळांबाबत निर्णय ‘जैसे थे’ राहणे शक्य आहे. ३१ जुलैनंतर याबाबत शासन निर्णय घेईल. 

९ जुलैपूर्वीसारखीच राहणार सवलतजिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, मनपा आयुक्तांनी शहराकरिता ९ ते १८ जुलैपर्यंत प्रतिबंध घातले होते, म्हणजे १८ जुलै रोजी त्यांनी घातलेले प्रतिबंध संपुष्टात येतील. ९ जुलैपूर्वी ज्या पद्धतीने सवलतींसह लॉकडाऊन सुरू होते, तीच परिस्थिती १९ जुलैपासून कायम होईल. पोलीस आयुक्तांकडून देखील असेच निर्णय असतील. सम-विषमबाबत शनिवारी निर्णय होईल. शासनाचे आदेश असल्यामुळे सम-विषम कायम राहील.

व्यापाऱ्यांना कोविड टेस्ट सक्तीचीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेतला. भाजीपाला, फळ, दूध, मांस विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारपूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल, त्यालाच रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद