शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

"नालायकांनो आपला पक्ष..."; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 4:43 PM

"आता तुमची लिमिट संपली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे..."

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'नालायक' शब्द वापरत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यानंतर, याच शब्दावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट, यांच्यात जबरदस्त वाकयुद्ध सुरू झाले आहे. आता या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे. "नालायकांनो आपला पक्ष सांभाळाना. आता तुमची लिमिट संपली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ते प्रत्रकारांसोबत बोलत होते.

शिरसाट म्हणाले, "काल उबाठा गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांसंदर्भात अपशब्द वापरले. त्यांनी सांगितले की त्या शब्दाला शिवी म्हणता येणार नाही. आम्हाला नालायक म्हणत आहे. आम्ही काय केले? सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे काम करतोय म्हणून नालायक, शिवसेना प्रमुखांच्या नावावर दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक, आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात कारवाई करत आहोत, जी ५० वर्षांत कुणाला जमले नाही, म्हणून आम्ही नालायक, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे सर्व करत आहोत, म्हणून आम्ही नालायक आहोत, आम्ही सर्वसामान्य जनतेत फिरत आहोत म्हणून आम्ही नालायक. आहोत आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाही. आम्ही कधी घरात बसून टोमने मारलेले नाही."

...म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येऊ लागले आहेत -"या नालायक शब्दासंदर्भा जे स्पष्टिकरण देत आहेत, त्या नालायकांना मला सांगायचे आहे, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, पण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात. कारण नालायक शब्द चांगला आहे. तुम्हाला तो आवडतोय, म्हणून मी तो वापरतोय. नालायकांनो ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वासाठी आपली हायात घालवली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करू नये, असे ज्यांचे मत होते. त्यांचे मत डावलून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे. म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. खरे तर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना हे मांडीवर घेऊन बसू लागले आहेत. म्हणून यांच्या तोंडात असे शब्द येऊ लागले आहेत. जे यांना शिव्या देत होते. जे यांची टिंगल टवाळी करत होत्या, अशा लोकांच्या सहवासात असल्याने यांच्या तोंडात असे शब्द येत आहेत," अशा बद्दात शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांव हल्ला चढवला.

ही आहे तुमची पोटदुखी -एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे नेते झाल्याचे दुःख तुम्हाला होत आहे, शिवसेने प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत, याचं दुःख तुम्हाला होत आहे. एकनाथ शिंदे आता सर्वसामान्यांना मान्य असलेलं नेतृत्व होत आहेत, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही बसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर. नालायकांना दुसरं काय सुचणार? हीच तुमची लायकी आहे ना?

आता वाकडं बोलाल, तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल -देशाच्या राजकारणावर बोलतायला जात आहे. मुख्यमंत्री तेलंगाणामध्ये  गेले, तर एकीकडे त्यांच्यावर टीका करतायत, तर दुसरीकडे म्हणताय राष्ट्रवादीला का घेऊन गेले नाही? अरे बाबा तुम्हाला काय करायचंय? नालायकांनो आपला पक्ष सांभाळाना. मी पहिल्यांदाच असं यासाठी बोलतोय की, आता तुमची लिमिट संपलेली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. तुम्हा स्वतःला काय समजता? शिवसेना प्रमुख समजता. आमचे दैवत आहे ते. कुणी तरी एकाठिकाणी हिंदुहृदय संम्राट लिहिलं. तर तुम्ही टीका करायला सुरुवात केली. शिसैनिक बाळासाहेबांच्या चरणी लीन होण्यासाठी जात असताना दगडफेक करता तुम्ही. त्यांना गचांड्या देता तुम्ही. नालायकांनो तुम्हाला हे पाप फेडावे लागणार आहे.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण