शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आता आषाढातही शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:02 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : आषाढ महिना व त्यानंतर संपूर्ण चतुर्मासात लग्न केले जात नाही. मात्र, यंदा काही पंचांगकर्त्यांनी आषाढातही ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : आषाढ महिना व त्यानंतर संपूर्ण चतुर्मासात लग्न केले जात नाही. मात्र, यंदा काही पंचांगकर्त्यांनी आषाढातही ८ लग्नतिथी दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील काही मंगल कार्यालयांत तारखा बुक झाल्या आहेत. या काळात बुकिंगचे प्रमाण कमी असले तरीही ज्यांचे विवाह कोरोनाच्या मागील वर्षाच्या लाॅकडाऊनपासून खोळंबले आहेत ते वधू-वर आता जास्त वाट न पाहता आषाढात लग्न उरकून घेणार आहेत.

शुभ मुहूर्तावर लग्न लावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. एखाद्या शुभ मुहूर्तावर लग्न केल्याने विवाह निर्विघ्न पार पडतात. तसेच त्या दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, अशी लोकांमध्ये भावना आहे. यामुळे बहुतांश जणांचा पंचांगामध्ये दिलेल्या लग्न तिथी व शुभ मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न असतो. आषाढात लग्न करावे की नाही, याविषयी पंचांगकर्त्यांमध्ये मतभिन्नता आहे. काहींनी मुख्य काळातील लग्न व काहींनी गौण काळातील लग्न तिथी दिल्या आहेत. मुख्य काळातील लग्नतिथी संपल्या आहेत. आता आषाढ महिना सुरू झाला आहे. आषाढ, चतुर्मासात लग्नतिथी नसते; पण आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून यंदा पंचांगात गौण काळ संबोधून आषाढातही लग्नतिथी दिल्या आहेत. ११ जुलैपासून आषाढ मासारंभ झाला. ८ ऑगस्ट रोजी आषाढी आमावस्या होऊन आषाढाची सांगता होणार आहे. यादरम्यान १८, २२, २५, २६, २९ जुलै व ४ ऑगस्ट या गौण लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. याच दरम्यान २३ जुलै रोजी चतुर्मासारंभ होत आहे. संपूर्ण चतुर्मासात म्हणजे ३० ऑक्टोबरपर्यंत ३८ लग्नतिथी आहेत. मागील वर्षी व यंदा लॉकडाऊनमुळे खोळंबलेले विवाह यंदा आषाढात केले जात आहेत. यामुळे मंगल कार्यालयांतून ‘शुभमंगल सावधान’चे सूर या काळात कानी पडतील.

चौकट

आषाढात लग्न टाळतात

पूर्वी आषाढ व चतुर्मासात लग्न केले जात नव्हते. मात्र, आता मुला-मुलींचे वाढते वय, घरातील अन्य अडचणी यामुळे अशा आणीबाणीच्या प्रसंगी ‘गौण’ मुहूर्त पंचांगात दिले जात आहेत. पण, या काळात देव विश्रांती घेतात, असे म्हटले जाते. लग्नासारखा आयुष्याला कलाटणी देणारा विधी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने करावा. म्हणून देव विश्रांती करीत असताना आषाढ व संपूर्ण चतुर्मासात विवाह करणे टाळले जाते.

माझ्या मते आषाढ व चतुर्मासात लग्न करणे टाळावे.

दुर्गादास मुळे गुरुजी

---

आषाढात लग्न मुहूर्त आहेत

पूर्वी वर्षातील ६ ते ८ महिने लग्न तिथी नसत. यात अनेकांची अडचण होत असे. यावर तोडगा म्हणून पूर्वीच्या नियमांप्रमाणे मुख्य काळात लग्नमुहूर्त द्यायचे आणि इतर ग्रंथांच्या आधारे चतुर्मासात व गुरू-शुक्र अस्तकालात ‘गौण’ लग्न मुहूर्त द्यायचे, असा निर्णय २०१९ मध्ये महाराष्ट्र व गुजरातमधील पंचांगकर्त्यांनी एकत्र येऊन घेतला. त्यासाठी सर्व पुरातण ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला होता. यामुळे आषाढात लग्न करण्यास हरकत नाही.

सुरेश केदारे गुरुजी

----

शहरातील काही मंगल कार्यालय बुक

शहरातील काही मंगल कार्यालयांत आषाढातील काही तारखा बुक झाल्या आहेत. तर काही बोटावर मोजण्या इतक्या मंगल कार्यालयांत ऑगस्ट, सप्टेंबरच्याही काही तारखा लग्नासाठी बुक झाल्या आहेत. मंगल कार्यालयांच्या मालकांनी सांगितले की, मागील वर्षी लॉकडाऊनमुळे ज्यांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह पुढे ढकलले होते तेच आता या काळात लग्न उरकून घेत आहेत. अनेक जणांमध्ये अजूनही तिसऱ्या लाटेमुळे पुढे लॉकडाऊन लागू शकते याची भीती आहे. यामुळे आता अनलाॅक काळात ‘गौण’ लग्न मुहूर्तावर लग्न करण्याचा निर्णय वधू-वरांच्या पित्यांनी केला असल्याने मोजक्या तारखा बुक होत आहेत.

---

चौकट

परवानगी ५० जणांचीच; पण...

काही दिवसांपूर्वी मंगल कार्यालयांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के वऱ्हाडींना परवानगी दिली जात होती. मात्र, ही परवानगी जास्त काळ टिकली नाही. आता ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडावे लागत आहे. मागील महिन्यात काही मंगल कार्यालये, लॉन्स येथे परवानगीपेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने तिथे दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाचे लक्ष मंगल कार्यालयांवर असल्याने कार्यालयाचे मालक स्वत: जातीने वऱ्हाडींच्या उपस्थितीवर लक्ष देत आहेत.