शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:23 IST

कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे.

ठळक मुद्देशहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये गंभीर वळण घेतले आहे. कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरण्यात आले आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार, अशी घोषणा त्यांनी केली. यापूर्वी अनेकदा संधी देऊनही प्रशासनाने पाणीपुरठ्यात कोणतीच सुधारणा केली नाही. ही कारवाई किती दिवसांत होणार यावर महापौरांनी मौन बाळगले.

शहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महापालिकेत येणारी बहुतांश शिष्टमंडळे पाण्यासाठीच असतात. समाधानकारक पाणी मिळाल्यास नागरिक कशासाठी मनपातील येतील, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. बुधवारी दुपारी महापौरांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी एमआयएम नगरसेवक उपस्थित होते. शहागंज टाकीवरून तब्बल १८ वॉर्डांतील नागरिकांची तहान भागते. या वॉर्डांना पाच दिवसाआड म्हणून सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत ७०० आणि १,४०० मि.मी. व्यासाच्या दोन स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. 

शहागंज टाकीत मुबलक पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही, एवढे कारण देऊन नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्यास नकार दिला. मनपाने काहीही करून या भागातील नागरिकांनाही ३ दिवसाआडच पाणी द्यावे, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही प्रशासनाला तीन दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत करा, असा आदेशही त्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी