शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:23 IST

कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे.

ठळक मुद्देशहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये गंभीर वळण घेतले आहे. कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरण्यात आले आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार, अशी घोषणा त्यांनी केली. यापूर्वी अनेकदा संधी देऊनही प्रशासनाने पाणीपुरठ्यात कोणतीच सुधारणा केली नाही. ही कारवाई किती दिवसांत होणार यावर महापौरांनी मौन बाळगले.

शहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महापालिकेत येणारी बहुतांश शिष्टमंडळे पाण्यासाठीच असतात. समाधानकारक पाणी मिळाल्यास नागरिक कशासाठी मनपातील येतील, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. बुधवारी दुपारी महापौरांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी एमआयएम नगरसेवक उपस्थित होते. शहागंज टाकीवरून तब्बल १८ वॉर्डांतील नागरिकांची तहान भागते. या वॉर्डांना पाच दिवसाआड म्हणून सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत ७०० आणि १,४०० मि.मी. व्यासाच्या दोन स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. 

शहागंज टाकीत मुबलक पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही, एवढे कारण देऊन नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्यास नकार दिला. मनपाने काहीही करून या भागातील नागरिकांनाही ३ दिवसाआडच पाणी द्यावे, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही प्रशासनाला तीन दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत करा, असा आदेशही त्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी