शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:23 IST

कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे.

ठळक मुद्देशहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये गंभीर वळण घेतले आहे. कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरण्यात आले आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार, अशी घोषणा त्यांनी केली. यापूर्वी अनेकदा संधी देऊनही प्रशासनाने पाणीपुरठ्यात कोणतीच सुधारणा केली नाही. ही कारवाई किती दिवसांत होणार यावर महापौरांनी मौन बाळगले.

शहरातील एकाही वॉर्डात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. जिकडेतिकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महापालिकेत येणारी बहुतांश शिष्टमंडळे पाण्यासाठीच असतात. समाधानकारक पाणी मिळाल्यास नागरिक कशासाठी मनपातील येतील, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. बुधवारी दुपारी महापौरांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी एमआयएम नगरसेवक उपस्थित होते. शहागंज टाकीवरून तब्बल १८ वॉर्डांतील नागरिकांची तहान भागते. या वॉर्डांना पाच दिवसाआड म्हणून सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत ७०० आणि १,४०० मि.मी. व्यासाच्या दोन स्वतंत्र जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. 

शहागंज टाकीत मुबलक पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही, एवढे कारण देऊन नागरिकांना तीन दिवसाआड पाणी देण्यास नकार दिला. मनपाने काहीही करून या भागातील नागरिकांनाही ३ दिवसाआडच पाणी द्यावे, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही प्रशासनाला तीन दिवसाआड पाणी मिळालेच पाहिजे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत करा, असा आदेशही त्यांनी दिला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी