शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:06 IST

आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

औरंगाबाद : आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.सकाळी ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. ‘काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता? असे सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केले.नरेंद्र मोदी खासदारांनाही बोलू देत नाहीत. ‘नोकरी’ (पदे) टिकवण्यासाठी मोठ-मोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजरेगिरी करतात, याचे अनेक किस्से पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले. ‘अब आप हमको सीखाऐंगे क्या? असा सवाल त्यांनी मला केला. मग त्या बैठकीत कुणालाच बोलू दिले गेले नाही.जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, असे ते म्हणाले.सगळ्यात वाईट मुख्यमंत्री...देवेंद फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. पटोले यांनी सांगितले की, महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. या मंडळींनी महाराष्टÑाचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकर नाईक यांनी सुरू केलेल्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलले आणि महाराष्टÑात पाणीच पाणी असे सांगत ते देशभर मार्केटिंग करीत फिरत आहेत. मग महाराष्टÑातील १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे चालू आहेत.मराठवाड्यातून १ हजार २५० उद्योग गेले. राज्यावरील कर्जाचा बोजा आघाडी सरकारच्या काळातल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढला. दरवर्षी पाच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात केले होते. प्रत्यक्षात नोकºया तर दिल्या नाहीतच; पण त्या खाल्ल्या. आज राज्य सरकारी कर्मचाºयांची संख्या ४० टक्केच आहे. ६० टक्के कर्मचारी कमी आहेत. हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही, असे पटोलेंनी बजावले.यावेळी श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद