शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:06 IST

आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

औरंगाबाद : आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.सकाळी ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. ‘काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता? असे सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केले.नरेंद्र मोदी खासदारांनाही बोलू देत नाहीत. ‘नोकरी’ (पदे) टिकवण्यासाठी मोठ-मोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजरेगिरी करतात, याचे अनेक किस्से पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले. ‘अब आप हमको सीखाऐंगे क्या? असा सवाल त्यांनी मला केला. मग त्या बैठकीत कुणालाच बोलू दिले गेले नाही.जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, असे ते म्हणाले.सगळ्यात वाईट मुख्यमंत्री...देवेंद फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. पटोले यांनी सांगितले की, महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. या मंडळींनी महाराष्टÑाचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकर नाईक यांनी सुरू केलेल्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलले आणि महाराष्टÑात पाणीच पाणी असे सांगत ते देशभर मार्केटिंग करीत फिरत आहेत. मग महाराष्टÑातील १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे चालू आहेत.मराठवाड्यातून १ हजार २५० उद्योग गेले. राज्यावरील कर्जाचा बोजा आघाडी सरकारच्या काळातल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढला. दरवर्षी पाच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात केले होते. प्रत्यक्षात नोकºया तर दिल्या नाहीतच; पण त्या खाल्ल्या. आज राज्य सरकारी कर्मचाºयांची संख्या ४० टक्केच आहे. ६० टक्के कर्मचारी कमी आहेत. हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही, असे पटोलेंनी बजावले.यावेळी श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद