शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:06 IST

आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

औरंगाबाद : आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.सकाळी ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. ‘काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता? असे सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केले.नरेंद्र मोदी खासदारांनाही बोलू देत नाहीत. ‘नोकरी’ (पदे) टिकवण्यासाठी मोठ-मोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजरेगिरी करतात, याचे अनेक किस्से पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले. ‘अब आप हमको सीखाऐंगे क्या? असा सवाल त्यांनी मला केला. मग त्या बैठकीत कुणालाच बोलू दिले गेले नाही.जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, असे ते म्हणाले.सगळ्यात वाईट मुख्यमंत्री...देवेंद फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. पटोले यांनी सांगितले की, महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. या मंडळींनी महाराष्टÑाचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकर नाईक यांनी सुरू केलेल्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलले आणि महाराष्टÑात पाणीच पाणी असे सांगत ते देशभर मार्केटिंग करीत फिरत आहेत. मग महाराष्टÑातील १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे चालू आहेत.मराठवाड्यातून १ हजार २५० उद्योग गेले. राज्यावरील कर्जाचा बोजा आघाडी सरकारच्या काळातल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढला. दरवर्षी पाच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात केले होते. प्रत्यक्षात नोकºया तर दिल्या नाहीतच; पण त्या खाल्ल्या. आज राज्य सरकारी कर्मचाºयांची संख्या ४० टक्केच आहे. ६० टक्के कर्मचारी कमी आहेत. हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही, असे पटोलेंनी बजावले.यावेळी श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद