शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

साखर आयुक्तांकडून पाच कारखान्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:56 IST

महाराष्टÑातील १५, तर औैरंगाबाद विभागातील तब्बल पाच कारखान्यांनी उसाचे पैसे थकविले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे देणे प्रत्येक कारखान्याला बंधनकारक आहे.

साखर आयुक्तांकडून पाच साखर कारखान्यांना नोटिसाऔैरंगाबाद : महाराष्टÑातील १५, तर औैरंगाबाद विभागातील तब्बल पाच कारखान्यांनी उसाचे पैसे थकविले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे देणे प्रत्येक कारखान्याला बंधनकारक आहे. मागील तीन महिन्यांपासून निव्वळ चालढकल सुरू आहे. दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी होरपळून निघत आहे, त्यात साखर कारखान्यांकडून आणखी चटके देण्यात येत आहेत. साखर आयुक्तांनी पाच कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचा आरोप आज एका पत्रकार परिषदेत करण्यात आला.

अ‍ॅड. के. ई. हरिदास, गंगाभीषण थावरे, सुभाष लोमटे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षात उसाचे दर निश्चित करून दिले. ऊस उत्पादकांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे अदा करावेत, असेही बजावले. माजलगाव व आसपासच्या साखर कारखान्यांनी याची अंमलबजावणी केली नाही. साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. एवढे करूनही शेतकºयांना न्याय मिळायला तयार नाही. दप्तर दिरंगाईमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मराठवाड्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. दैैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकरी कर्जाच्या खाईत आपोआप लोटला जात आहे. बँका, सावकार कर्ज वसुलीसाठी तगादा करीत आहेत. एकीकडे उसाचे पैैसे मिळेनात, तर दुसरीकडे कर्जावर व्याज वाढत आहे. उसाचे पैसे साखर कारखान्यांनी त्वरित द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती भयावह आहे. तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. चाराटंचाईही आहे. अन्नधान्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. महागाईमुळे कष्टकºयांचे कंबरडे मोडले जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखाने