शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाटबंधारे विभागाकडून थकबाकीसाठी औरंगाबाद मनपा, जालना, पैठण नगरपालिकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 20:01 IST

जायकवाडी प्रकल्प पैठण येथून औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण शहरासाठी उपसा केलेल्या पाण्याची फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत थकबाकी असून, ती १८ मार्चपर्यंत न भरल्यास १९ मार्चपासून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्प पैठण येथून औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण शहरासाठी उपसा केलेल्या पाण्याची फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत थकबाकी असून, ती १८ मार्चपर्यंत न भरल्यास १९ मार्चपासून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

औरंगाबाद पालिकेकडे ८ कोटी ५८ लाख ६४ हजार, जालना नगरपालिकेकडे १ कोटी ७१ लाख ४० हजार, तर पैठण नगरपालिकेकडे ७३ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे. जायकवाडी पाटबंधारे कार्यालयाकडून थकीत पाणीपट्टी वसुलीबाबत वारंवार पत्रव्यवहार करून तसेच समक्ष भेटूनसुद्धा अद्यापपर्यंत थकीत रक्कम आपण जलसंपदा विभागाकडे भरणा केली नसल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण नगर परिषदेला कळविले आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून तसेच शासनाकडून वारंवार पाठपुरावा व विचारणा होत असल्याकारणाने सदरील थकबाकी तत्काळ भरणा करण्यात यावी.अन्यथा बिगर सिंचन योजनेचा जायकवाडी जलाशयातून सुरू असलेला पाणीपुरवठा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ९७ (१) व कलम ४५ (ज) अन्वये टप्प्याटप्प्याने बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे. 

औरंगाबाद मनपा, जालना नगरपालिका पैठण नगर परिषदेने पाणीपट्टी न भरल्यामुळे होणारा पाणीपुरवठा नियमानुसार बंद केल्यास शहरातील नागरिकांना होणार्‍या गैरसोयीला संबंधित मनपा, नगर परिषद जबाबदार राहील, याची नोंद घेऊन तातडीने पाणीपट्टीची थकीत रक्कम अदा करावी.

थकबाकी भरा अन्यथा पाणी उपसा बंद १९ मार्च रोजी सकाळी ११ वा. दोन तास पाणी उपसा बंद करण्यात येईल, २० मार्च रोजी ११ वा. चार तास पाणी उपसा बंद करण्यात येईल. २१ मार्च रोजी ११ वा. सहा तास पाणी उपसा बंद करण्यात येईल, २२ मार्च रोजी ११ वा. आठ तास पाणी उपसा बंद करण्यात येईल. २३ मार्च रोजी पूर्णपणे पाणी उपसा बंद करण्यात येईल, असे जायकवाडी प्रकल्प पाटबंधारे विभागाने नोटिशीमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद