शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

गुणवत्ता घसरल्यामुळे आणखी पाच शिक्षकांना नोटीस; ‘सीईओं’च्या आदेशाने कारवाई

By राम शिनगारे | Updated: March 27, 2024 13:47 IST

तपासणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकाची स्थापना

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट दिल्यानंतर गुणवत्ता प्रचंड घसरलेली असल्याचे त्यांना आढळून आले होते. लासूर स्टेशन येथील जि. प. शाळेलाही सीईओंनी भेट दिली तर प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोकूळ जळगाव येथील जि. प. शाळेला भेट दिली. या दोन्ही शाळांमध्ये गुणवत्ता घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दोन शाळांतील पाच शिक्षकांना नोटीस देत गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांना १९ मार्च रोजी पाबळतांडा येथील जि. प. शाळेला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना शाळेतील २२ पैकी केवळ एकच विद्यार्थ्यास संख्या वाचन व गणितीय क्रिया करता आल्या. या प्रकरणात त्या शाळेतील सहशिक्षक दिलीप ढाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई सीईओंनी केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. विविध शिक्षक संघटनांनी ही सूडबुद्धीची कारवाई असल्याचे स्पष्ट करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही सीईओंच्या शाळांना गाठी-भेटी थांबलेल्या नाहीत. सीईओंनी लासूर स्टेशन येथील शाळेला भेट दिली असता, त्याठिकाणी गुणवत्ता घसरल्याचे दिसून आले. या शाळेतील दोन शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे. त्याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोकूळ जळगाव येथील शाळेला भेट दिली. तेथेही हीच परिस्थिती आढळून आली आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या तीन शिक्षकांना नोटीस दिल्यामुळे नोटीस पाठविलेल्या शिक्षकांची संख्या पाचवर पोहोचली आहे. तर एका शिक्षक नेत्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

आता होणार शाळांची तपासणीसीईओ विकास मीना यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळांच्या तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यात एक पथकच नेमले आहे. या पथकात विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख असणार आहेत. हे पथक शाळांमधील गुणवत्ता तपासणी, भौतिक सुविधा आणि मतदान केंद्रांची तपासणी करणार आहेत.

२३४ शिक्षक शाळांमध्ये रुजूजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमात २०४ आणि उर्दू माध्यमात ३०, असे एकूण २३४ शिक्षक रुजू झाले आहेत. तसेच उर्वरित शिक्षक लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच रुजू होतील, असेही शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र