शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

वाढत्या कोरोनाची खंडपीठाकडून दखल; सुमोटो याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:26 IST

खंडपीठाने प्रशासनाला विविध निर्देश दिले असून, त्यांचा पूर्तता अहवाल मागविला आहे

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या, तसेच अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आदी बाबींविषयक स्थानिक वर्तमानपत्रामधील दहा बातम्यांची स्वत:हून दखल घेत न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी त्या बातम्यांनाच सुमोटो जनहित याचिका म्हणून शुक्रवारी दाखल करून घेतले.

खंडपीठाने प्रशासनाला विविध निर्देश दिले असून, त्यांचा पूर्तता अहवाल मागविला आहे, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र एस. देशमुख यांची अमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नेमणूक केली आहे. याचिकेची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी ३ जुलै रोजी होणार आहे.

खंडपीठाचे निर्देशकोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे काम सोपविलेले असताना हजर न झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती देण्याचे, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यासह योग्य ती कार्यवाही करण्याचे व त्याची माहिती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची माहिती प्रशासनाला न देणाऱ्या खाजगी दवाखाने आणि प्रयोगशाळा यांच्याविरुद्ध कार्यवाही करून त्याचा अहवाल खंडपीठाने मागविला आहे.

कोविड आणि इतर रुग्णांनाही दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या या खाजगी दवाखान्यांविरुद्ध, तसेच कर्तव्य सोपविलेले असताना निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कार्यवाही करून त्याचा अहवाल खंडपीठाने मागविला आहे. लोकांमध्ये संपर्काद्वारे विषाणूंचा होणारा प्रसार याबाबतचे रेकॉर्ड (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) जतन करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. त्याचप्रमाणे क्वारंटाईन सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळतात किंवा नाही याबाबत लक्ष ठेवता येईल. क्वारंटाईन सेंटरमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. कंटेन्मेंट झोनमधील काही व्यक्ती झोनबाहेर ये-जा करतात त्यामुळेही विषाणूचा प्रसार होतो. त्यावर सक्त लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. शासनातर्फे सरकारी वकील डी.आर. काळे काम पाहत आहेत. 

खंडपीठाची अपेक्षाशहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची भयावह पद्धतीने वाढत चाललेली संख्या, ही साथ नियंत्रणात आणण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव, रुग्णांची होणारी हेळसांड आणि रुग्णसाखळी तोडण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा, आदी अनेक बाबींची दखल घेत सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि इतर यंत्रणांनी योग्य समन्वयाने काम करून ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.

या दहा बातम्यांची खंडपीठाने घेतली दखल१. विभागीय आयुक्तांसोबत लोकप्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत औरंगाबादमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याबाबत लोकप्रतिनिधींनी खंत व्यक्त केली.२. २४ जूनला २०० आणि २५ जूनला २६० कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ झाली.३. महापालिकेने कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या शिक्षकांपैकी एक हजार शिक्षक रुजू झाले नाहीत.४. मनपा आयुक्त शहरात केरळ आणि धारावी पॅटर्न लागू करणार असल्याबाबतची बातमी.५. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी कायद्यानुसार परिणामकारक पावले उचलल्याबाबत पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेले मत.६. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या सनदी अधिका?्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटल्याबाबतची बातमी.७. जालना येथील आयसोलेशन सेंटरमधील शौचालयात वयस्क महिलेचा मृतदेह दोन दिवस पडून राहिला. मात्र ती महिला बेपत्ता असल्याचा अहवाल दिल्याबाबत बातमी.८. रुग्णाच्या मृत्यूनंतर घेतलेल्या स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांना सोपविला जातो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास मृतदेहाची विल्हेवाट शासकीय यंत्रणेने लावणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. त्याची पायमल्ली होत असल्याबाबत बातमी.९. क्वारंटाईन सेंटरमधून व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या बातम्या.१०. क्वारंटाईन सेंटरमधील काही लोकांना अन्न दिले जात नाही, तर काहींना योग्य अन्न मिळत नाही याबाबतच्या बातम्या.

या दहा बातम्यांची स्वत:हून दखल घेत खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ