शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आठ ‘बीईओं’ना नोटिसा

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादअचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती. एक वर्षानंतर त्याचे रिफीलिंग करणे आवश्यक होते. परंतु, ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने ना मुख्याध्यापकांनी ही लक्षात घेतली. यासंदर्भात २१ जुलै रोजी ‘लोकमत’ ६० टक्के अग्निरोधक कालबाह्य, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठही गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या रिफिलींगचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.तुळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोषण आहार शिजविताना अचानक सिलिंडरला जोडलेल्या पाईपला आग लागली. शाळेमध्ये असलेले अग्निरोधक कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी शाळेपासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरून अग्निरोधक आणून आग विझविली. कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. अशा स्वरूपाच्या अचानक घडणाऱ्या घटनांचा धोका लक्षात घेऊनच शासनाने २००८-२००९ या वर्षामध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषद आणि नगर परिषद मिळून अकराशेवर शाळांना अग्निरोधक दिली होती. एक वर्षानंतर अग्निरोधकाचे रिफिलींग करणे आवश्यक होते. परंतु, बहुतांश मुख्याध्यापक वा अधिकाऱ्यांनी त्यावर फारसे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजघडीला सुमारे ६० टक्क्यांवर अग्निरोधके कालबाह्य झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.दरम्यान, अग्निरोधक हे शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्याबाबत सूचना असतानाही काही शाळांमध्ये ते अडगळीला पडले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते कसे हाताळायचे याची कर्मचाऱ्यांना कल्पना नाही. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे यांनी मंगळवारी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना (बीईओ) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या स्थितीबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रिफिलींगबाबत वर्षभरापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही जणांनी रिफिलींग करून घेतले आहे. मात्र, त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत.- ए. एस. उकिरडे, शिक्षणाधिकारी.