शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

आठ ‘बीईओं’ना नोटिसा

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादअचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती. एक वर्षानंतर त्याचे रिफीलिंग करणे आवश्यक होते. परंतु, ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने ना मुख्याध्यापकांनी ही लक्षात घेतली. यासंदर्भात २१ जुलै रोजी ‘लोकमत’ ६० टक्के अग्निरोधक कालबाह्य, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठही गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या रिफिलींगचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.तुळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोषण आहार शिजविताना अचानक सिलिंडरला जोडलेल्या पाईपला आग लागली. शाळेमध्ये असलेले अग्निरोधक कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी शाळेपासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरून अग्निरोधक आणून आग विझविली. कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. अशा स्वरूपाच्या अचानक घडणाऱ्या घटनांचा धोका लक्षात घेऊनच शासनाने २००८-२००९ या वर्षामध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषद आणि नगर परिषद मिळून अकराशेवर शाळांना अग्निरोधक दिली होती. एक वर्षानंतर अग्निरोधकाचे रिफिलींग करणे आवश्यक होते. परंतु, बहुतांश मुख्याध्यापक वा अधिकाऱ्यांनी त्यावर फारसे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजघडीला सुमारे ६० टक्क्यांवर अग्निरोधके कालबाह्य झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.दरम्यान, अग्निरोधक हे शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्याबाबत सूचना असतानाही काही शाळांमध्ये ते अडगळीला पडले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते कसे हाताळायचे याची कर्मचाऱ्यांना कल्पना नाही. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे यांनी मंगळवारी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना (बीईओ) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या स्थितीबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रिफिलींगबाबत वर्षभरापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही जणांनी रिफिलींग करून घेतले आहे. मात्र, त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत.- ए. एस. उकिरडे, शिक्षणाधिकारी.