शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आठ ‘बीईओं’ना नोटिसा

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादअचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती. एक वर्षानंतर त्याचे रिफीलिंग करणे आवश्यक होते. परंतु, ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने ना मुख्याध्यापकांनी ही लक्षात घेतली. यासंदर्भात २१ जुलै रोजी ‘लोकमत’ ६० टक्के अग्निरोधक कालबाह्य, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठही गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या रिफिलींगचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.तुळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोषण आहार शिजविताना अचानक सिलिंडरला जोडलेल्या पाईपला आग लागली. शाळेमध्ये असलेले अग्निरोधक कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी शाळेपासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरून अग्निरोधक आणून आग विझविली. कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. अशा स्वरूपाच्या अचानक घडणाऱ्या घटनांचा धोका लक्षात घेऊनच शासनाने २००८-२००९ या वर्षामध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषद आणि नगर परिषद मिळून अकराशेवर शाळांना अग्निरोधक दिली होती. एक वर्षानंतर अग्निरोधकाचे रिफिलींग करणे आवश्यक होते. परंतु, बहुतांश मुख्याध्यापक वा अधिकाऱ्यांनी त्यावर फारसे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजघडीला सुमारे ६० टक्क्यांवर अग्निरोधके कालबाह्य झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.दरम्यान, अग्निरोधक हे शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्याबाबत सूचना असतानाही काही शाळांमध्ये ते अडगळीला पडले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते कसे हाताळायचे याची कर्मचाऱ्यांना कल्पना नाही. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे यांनी मंगळवारी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना (बीईओ) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या स्थितीबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रिफिलींगबाबत वर्षभरापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही जणांनी रिफिलींग करून घेतले आहे. मात्र, त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत.- ए. एस. उकिरडे, शिक्षणाधिकारी.