शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याने केंद्र व राज्य शासनाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:57 IST

crop insurance news : शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळू नयेत आणि कंपनीचा फायदा व्हावा, यासाठी खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

ठळक मुद्दे सिल्लोड तालुक्यातील १ लाख १८,४०२ शेतकरी पीक विम्यापासून वंचितपीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याबाबत दाखल जनहित याचिका

औरंगाबाद : विम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमीयम) ४ कोटी ७९ लाख ८९९०.९० रुपये भरलेले असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधीला १ लाख १८ हजार ४०२ शेतकरीपीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे. ( Aurangabad High Court's Notice to Central and State Governments for depriving farmers of crop insurance compensation ) 

काय आहे याचिकाकेंद्र शासनाच्या पीक विमा योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील १ लाख १८ हजार ४०२ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी एचडीएफसी इरगो विमा कंपनीकडे पीक विम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमीयम) ४ कोटी ७९ लाख ८९९०.९० रुपये भरले आहेत. असे असताना २०२० साली अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊनही शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याबाबत देवीदास हरिभाऊ लोखंडे व इतर २८ शेतकऱ्यांनी ॲड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोपराज्य शासनाने २९ जून २००० च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याची तरतूद केली आहे. याचिकाकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता सिल्लोड तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील हजर नसताना, पीक पाहणीच्या तारखांपूर्वीच पंचनामे तयार केले असल्याचे निदर्शनास आले. यावरून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळू नयेत आणि कंपनीचा फायदा व्हावा, यासाठी खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

यांना नोटिसा बजावण्याचा आदेशखंडपीठाने केंद्रिय कृषी मंत्रालयामार्फत केंद्र शासन, कृषी विभागाच्या सचिवांमार्फत राज्य शासन, कृषी आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, सिल्लोडचे गट विकास अधिकारी, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक आणि एचडीएफसी इरगो विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाagricultureशेती