शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे तिकीट आताच भेटना; ६० दिवसांमुळे ‘वेटिंग’ वाढून तिकिटांचा होईल काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:19 IST

आरक्षणासाठीचा कालावधी १२० वरून ६० दिवस; या निर्णयाविषयी प्रवाशांमधून नाराजी 

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेचे आताच तिकीट मिळत नाही. ६० दिवसांमुळे आणखी ‘वेटिंग’ वाढेल. यातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणखी वाढेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे शक्य होते. रेल्वेचे तिकीट आरक्षित करणेही सोयीचे होते. परंतु ६० दिवसआधी तिकीट बुकिंगच्या निर्णयामुळे रेल्वेंना प्रवाशांची झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे आगामी ६० दिवसांतीलच करावे लागेल. त्यामुळे घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

१२० दिवस कायम राहावेरेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवस कायम राहावे.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’

पर्यटनाचे नियोजन कोलमडेलअनेक जण नियोजन करून कुटुंबासह पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटनाचे नियोजन कोलमडेल. याचा पर्यटननगरीलाही फटका बसेल. रेल्वेंना वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम राहावा.-राज सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना

नियोजन करणे अशक्य६० दिवसांनंतर कुठे रेल्वेने जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हाॅटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास पुढे ढकलावा लागेल. त्यामुळे कोणताही बदल करता कामा नये.-अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

तारखेनुसार नियोजनज्या तारखेला जायचे असेल, त्यानुसार रेल्वेच्या तिकिटाचे बुकिंगचे नियोजन करावे लागले. प्रवासाची तारीख आणि बुकिंगची ६० दिवस आधीचा कालावधी, हे पाहून प्रवाशांना नियोजन करावे लागेल.-जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन