शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

रेल्वेचे तिकीट आताच भेटना; ६० दिवसांमुळे ‘वेटिंग’ वाढून तिकिटांचा होईल काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:19 IST

आरक्षणासाठीचा कालावधी १२० वरून ६० दिवस; या निर्णयाविषयी प्रवाशांमधून नाराजी 

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेचे आताच तिकीट मिळत नाही. ६० दिवसांमुळे आणखी ‘वेटिंग’ वाढेल. यातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणखी वाढेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे शक्य होते. रेल्वेचे तिकीट आरक्षित करणेही सोयीचे होते. परंतु ६० दिवसआधी तिकीट बुकिंगच्या निर्णयामुळे रेल्वेंना प्रवाशांची झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे आगामी ६० दिवसांतीलच करावे लागेल. त्यामुळे घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

१२० दिवस कायम राहावेरेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवस कायम राहावे.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’

पर्यटनाचे नियोजन कोलमडेलअनेक जण नियोजन करून कुटुंबासह पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटनाचे नियोजन कोलमडेल. याचा पर्यटननगरीलाही फटका बसेल. रेल्वेंना वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम राहावा.-राज सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना

नियोजन करणे अशक्य६० दिवसांनंतर कुठे रेल्वेने जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हाॅटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास पुढे ढकलावा लागेल. त्यामुळे कोणताही बदल करता कामा नये.-अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

तारखेनुसार नियोजनज्या तारखेला जायचे असेल, त्यानुसार रेल्वेच्या तिकिटाचे बुकिंगचे नियोजन करावे लागले. प्रवासाची तारीख आणि बुकिंगची ६० दिवस आधीचा कालावधी, हे पाहून प्रवाशांना नियोजन करावे लागेल.-जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन