शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

कचरा नव्हे, सोनेच!; औरंगाबादमध्ये आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:09 IST

कचर्‍याची कोंडी फुटावी या दृष्टीने महापालिका काम करायला तयार नाही. उलट महापालिकेसाठी कचरा सोन्याची खाण ठरत आहे.

ठळक मुद्देकच-याचे अर्थकारण : आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील एक महिन्यापासून कचराकोंडीने त्रस्त झालेले आहेत. कचर्‍याची कोंडी फुटावी या दृष्टीने महापालिका काम करायला तयार नाही. उलट महापालिकेसाठी कचरा सोन्याची खाण ठरत आहे. कचरा उचलण्याच्या प्रक्रियेच्या मुळाशी गेल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कचरा उचलण्यासाठी भाडेतत्त्वावर तब्बल १३६ रिक्षा घेण्यात आल्या आहेत. एका रिक्षाचे भाडे महिना २७ हजार रुपये आहे. वर्षाला रिक्षाच्या भाड्यापोटी मनपा ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करीत आहे. याशिवाय आणखी बरीच वाहने भाडेकरारावर घेतली आहेत. सर्वांचे वर्षाला भाडेच दहा कोटी रुपये होत आहे.

शहरातील कचराकोंडी फुटावी असे मनपालाही वाटत नाही. कचरा प्रश्नाच्या नावावर सुरू असलेली दुकानदारी आणखी कशी मोठी होईल, याचाच विचार अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. कचरा उचलण्याच्या कामाचे चक्क आऊटसोर्सिंग केले आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमून ठेवला आहे. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून या प्रक्रियेत काम करणार्‍या मंडळींनी ‘भर अब्दुल्ला...’ याप्रमाणे कचर्‍याला सोन्याची खाणच बनवून टाकले आहे. 

११५ वॉर्डांमधील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या यांत्रिकी, घनकचरा विभागाने २४५ रिक्षा कामाला लावल्या आहेत. त्यातील १३६ रिक्षा भाडेतत्त्वावरील आहेत. एका रिक्षाचे भाडे दररोज ९०० रुपये आहे. महिन्याला २७ हजार, वर्षाला ३ लाख २४ हजार रुपये एका रिक्षापोटी मनपा खर्च करीत आहे. एका वॉर्डाला दोन, तर काही वॉर्डांना तीनही रिक्षा देण्यात आल्या आहेत. १३६ रिक्षांचे महिन्याला भाडे ३७ लाख २६ हजार रुपये होते. वर्षाला ही रक्कम ४ कोटी ४७ लाखांपर्यंत जाते. रिक्षांची संख्या अधिक दाखवून निव्वळ मनपाच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोपही होत आहे. मनपा भाड्यावर जेवढा पैसा खर्च करते तेवढ्या रकमेत तर नवीन रिक्षांची खरेदी झाली असती.

डम्पर, ट्रॅक्टरचे स्वतंत्र कंत्राटवॉर्डांमध्ये जमा झालेला कचरा उचलण्यासाठी ४० ते ५० मोठी वाहने भाडेकरारावर लावली आहेत. या कामावरही दरवर्षी २ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात येत आहे. ही वाहने नेमकी कुठे आणि कधी धावतात, हे फक्त यांत्रिकी विभागालाच माहीत.

चालकही आऊटसोर्सिंगवरभाडेतत्त्वावर घेण्यात आलेली काही वाहने चालविण्यासाठी आणखी एका कंत्राटदाराकडून वाहनचालक घेण्यात आले आहेत. त्यांच्या पगारापोटी दरमहा लाखो रुपये मनपाला द्यावे लागत आहेत.

कंत्राटदारांची लागली रांगकचर्‍यावर प्रक्रिया करणे, यंत्रसामग्री खरेदी करा, असे म्हणत मनपाकडे आतापर्यंत ७० पेक्षा अधिक प्रस्ताव आले आहेत. दररोज किमान आठ ते दहा कंत्राटदार वेगवेगळे प्रकल्प घेऊन मनपात येत आहेत.प्रत्येक जण कचर्‍यावर प्रक्रिया करणारे आपले टेक्निक सर्वोत्तम असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे मनपाला शहरातील कचरा आणखी सोन्याची खाण असल्याचे वाटू लागले आहे.सोमवारी महापालिकेने कचर्‍यापासून वीजनिर्मितीसाठी इच्छुक कंपन्यांचे प्रस्ताव मागविल्याचे जाहीर केले. मात्र, निविदेत नेमके असे काहीच म्हटले नाही. कचर्‍यावर प्रक्रिया एवढेच लिहिले आहे.