शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच ! स्थगित निकाल जाहीर, नापासांना परीक्षा देता येणार

By राम शिनगारे | Updated: November 9, 2023 14:17 IST

संबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका, परीक्षेपासून कर्मचारी डिबार

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल महिन्यात शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा प्रकार घडला नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे तसेच संबंधित विद्यार्थ्यांचा ‘व्होल परफाॅर्मन्स कॅन्सल’(डब्यूपीसी) रद्द करण्याची केलेली शिफारसही रद्दबातल ठरविण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. ज्या उत्तरपत्रिकांमध्ये कॉपीचा प्रकार आढळला त्या विषयात संबंधित विद्यार्थ्यांवर नापासची कारवाई केली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर सायंकाळी उत्तरपत्रिका ३०० ते ५०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचा व्हीडिओ एका विद्यार्थिनीने व्हायरल केला होता. त्यामुळे ४ एप्रिल २०२३ रोजी एकच गोंधळ उडाला. या केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तज्ज्ञांकडून तपासून घेतल्या. या उत्तरपत्रिका संबंधितांनी निष्काळजीपणे तपासत मास कॉपी झाल्याचे लिहुन दिले. त्यानुसार हे प्रकरण तपासासाठी ४८(५) (क) समितीकडे पाठविले. त्या समितीने प्राध्यापकांच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांचा व्होल परफॉर्मन्स कॅन्सल (डब्ल्यूपीसी) ची कारवाई करण्याची शिफारस परीक्षा मंडळाकडे केली.

परीक्षा मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीच स्वत:च ४ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. दरम्यानच्या कालावधीत उत्तरपत्रिका तपासणाऱ्या काही प्राध्यापकांनी आम्ही निष्काळजीपणे उत्तरपत्रिका तपासल्याचे लिहुन दिले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी केली. त्यात विद्यार्थ्यांकडून मास कॉपी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. काही विषयांमध्ये कॉपी केल्याचा प्रकारही उघड झाला. मात्र, हा प्रकार मास कॉपीच्या नियमांत बसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयात नापास करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर परीक्षेसाठी घातलेली बंदीचा निर्णयही मागे घेतला आहे.

कोणत्या महाविद्यालयाचे होते विद्यार्थीपीपल्स कॉलेज ऑफ फाॅरेन्सिक सायन्स ॲण्ड सायबर सिक्युरिटी, शेंद्रा आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, शेंद्रा या दोन महाविद्यालयांतील ४१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात बी.एस्सी संगणक शास्त्राचे १९, बी.एस्सी आयटी ४, बीसीए मॅनेजमेंटचे १०, बीबीए ४५ आणि बी.एस्सी फाॅरेन्सिक सायन्सच्या ३४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कर्मचारी परीक्षेपासून डिबारसंबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह परीक्षेच्या कामातील सहभागींना तीन वर्षांसाठी परीक्षेच्या कामासाठी बंदी घालण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे योग्य नाहीशेंद्रा येथील परीक्षा केंद्रात घडलेला प्रकार हा मास कॉपी नव्हता. त्या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी केली. जे विद्यार्थी थोडे फार दोषी आढळले त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई केली. त्याविषयीची संपूर्ण माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. महाविद्यालयात जो प्रकार घडलाच नाही, त्याचा 'मीडिया ट्रायल' झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे योग्य नाही.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण