शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

‘ग्रामीण विकास’ची वेतनकोंडी; औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीचा कर्मचार्‍यांच्या वेतन तरतुदीसाठी असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 17:48 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद करण्याबाबत असहकाराची भूमिका घेतल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. 

औरंगाबाद : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद करण्याबाबत असहकाराची भूमिका घेतल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) बंद होणार की चालू राहणार याबद्दलचा संभ्रम कायम आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या अनेक योजना हळूहळू बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ‘डीआरडीए’मार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना, या दोन महत्त्वाच्या योजना राबविल्या जात आहेत. ‘डीआरडीए’ बंद करण्याच्या शासनाच्या कोणत्याही सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, पण या विभागाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाने अर्थसंकल्पीय तरतूद केलेली नाही. त्यामुळे सातत्याने या विभागातील कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंत योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीतील उसनवारी करून वेतन अदा केले जात होते. आता अवघ्या दोनच योजना शिल्लक राहिल्यामुळे त्यांचा निधीही उसनवारीने घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मागील नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचार्‍यांवर वेतनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

नुकतेच ग्रामविकास विभागाने एका पत्राद्वारे जिल्हा नियोजन समितीला सूचना दिल्या की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी निधीची तरतूद करावी. यासंबंधी ग्रामीण विकास यंत्रणेने वेतनासाठी निधीचा प्रस्तावही सादर केला; पण जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी तो पत्रव्यवहार गुलदस्त्यात टाकल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. 

वेतनासाठी लागतात वार्षिक दीड कोटीजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सध्या २६ अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या वेतनासाठी वार्षिक दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून वेतनासाठी अवघे १०-१५ लाखांची तरतूद करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक वेळी कर्मचार्‍यांची वेतनकोंडी होत असल्याची भावना कर्मचार्‍यांनी बोलून दाखविली. 

ग्रामविकास विभागाने या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने तरतूद करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनीही वेतनासाठी निधीची तरतूद करण्याची भूमिका घेतली; पण जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी मात्र असहकाराची भूमिका घेतल्याचेही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसा