शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ बनले नोडल केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:10 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजना : आयआयटी दिल्ली व विद्यापीठात सामंजस्य करार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.विद्यापीठाला उन्नत भारत अभियानाचे क्षेत्रीय नोडल केंद्र मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्नत भारत अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या अध्यक्षपदी संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर आहेत. तर आयआयटी दिल्ली संस्था हा प्रकल्प राबवत आहे. या अभियानासाठी राज्यातील चार विद्यापीठांची, १२ जिल्ह्यांची आणि ६२६ गावांची निवड केली आहे. या सर्व अभियानाचे नोडल केंद्र औरंगाबादचे विद्यापीठ असणार आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उन्नत भारत अभियानात सुरुवातीला पाच गावे दत्तक घेतली होती. यामध्ये गेवराई कुबेर, मावसाळा, करोडी, चांदापूर आणि चिंचोली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये हे अभियान यशस्वी केल्यामुळे विद्यापीठाला नोडल केंद्र देण्यात आले आहे. तसेच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ५५ महाविद्यालयांनी अभियानाचा प्रचार-प्रसार केला. त्याची दखल दिल्ली आयआयटीने घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. या अभियानासाठी लागणारा निधीही विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रासेयोचे संचालक डॉ. टी. आर. पाटील हे काम पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.चौकटगावांमधील या समस्यांचे करणार निवारणउन्नत भारत अभियानामध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांतील ६२६ गावांत अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी १३० शिक्षणसंस्था, महाविद्यालयांची निवड केली आहे. या अभियानात प्रामुख्याने गावातील स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, शेतसंबंधी विविध योजनांची अंमलबजावणी, सिंचन, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणाचा प्रचार व प्रसार, आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि गावातील आवश्यक असलेले कार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. टी. आर. पाटील यांनी सांगितले.------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ