शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘नो वर्क, नो पे’;  मराठवाड्यात शासन करणार दररोज २ कोटींचे वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:03 IST

या संपाला शासनाने गांभीर्याने मनावर घेत ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, तर दाम नाही) या भूमिकेने संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कपातीचे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्दे मराठवाड्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सुमारे १६ हजार कर्मचारी आहेत त्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या तीन दिवसांत शासनाच्या विरोधात संपाला मंगळवारपासून सुरुवात केली

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सुमारे १६ हजार कर्मचारी असून, त्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या तीन दिवसांत शासनाच्या विरोधात संपाला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. या संपाला शासनाने गांभीर्याने मनावर घेत ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, तर दाम नाही) या भूमिकेने संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कपातीचे आदेश जारी केले आहेत. २५ ते ४० हजार यादरम्यान वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांची तीन दिवसांतील सरासरी वेतन कपात केली तर दररोज २ कोटींच्या आसपास वेतन कपात होण्याची शक्यता आहे. अंदाजे ६ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत वेतनकपातीमुळे तीन दिवसांत पडतील. 

शासनाच्या अखत्यारीत सुमारे ४० ते ४२ विभाग आहेत. या विभागाचे मराठवाड्यात १६ हजार कर्मचारी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात संपाचा यल्गार पुकारला आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची यादी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सायंकाळपर्यंत प्राप्त यादीनुसार महसूल कर्मचाऱ्यांचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. ५ हजार ५९४ महसूल कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कापण्यात येणार आहे. उर्वरित १० हजार कर्मचारी जिल्हा परिषद, आरोग्यसेवा, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागातील असून त्यांच्यावर देखील वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जिल्हा प्रशासनाची भिस्त ६२ कर्मचाऱ्यांवरसंपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाची भिस्त फक्त ६२ कर्मचाऱ्यांवर होती. ब संवर्गातील १९, क संवर्गातील ७१८ आणि ड संवर्गातील १३० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ९४१ पैकी ८६७ कर्मचऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला. १२ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत. ६२ कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यातील पूर्ण यंत्रणा होती. त्यामुळे महसूल कामकाज पूर्णपणे ढेपाळले होते. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले, महसुली कर्मचारी संपामुळे सर्व कामांवर परिणाम झाला आहे. काम नाही, तर वेतन नाही, असे शासनाचे आदेश असल्यामुळे संपकाळात कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होऊ शकते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात गृहशाखा, महसूल शाखा, सामान्य प्रशासन, नियोजन, अभिलेख, निवडणूक विभाग कर्मचाऱ्यांअभावी ओस पडले होते. संघटनेने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यामध्ये अध्यक्ष महेंद्र गिरगे, डी.एम. देशपांडे, संतोष अनर्थे आदी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

टॅग्स :StrikeसंपState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी