शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

'उमेदवारी जाहीर होईपर्यंत माघार नाही'; अंबादास दानवेंचा लोकसभा लढण्याचा दावा कायम

By बापू सोळुंके | Updated: March 21, 2024 17:59 IST

मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागत आहोत.

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे ,जोपर्यंत पक्ष कोणाचीही उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नसल्याचा दावा, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यां पत्रकार परिषदेत केला .

आ. दानवे म्हणाले, मागील दोन लोकसभा निवडणुकीपासून आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागत आहोत. आताही उमेदवारी मागितली असल्याचा पुनरुच्चार करत दानवे म्हणाले, पक्षाने पक्षाने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही, यामुळे पक्षाची उमेदवारी घोषित होईपर्यंत आपला दावा कायम असेल. खैरे यांना तिकीट दिल्यास ते ४० गावात गेले तर मी ८० गावात जाऊन प्रचार करू असेही आ. दानवे म्हणाले . राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का ?या प्रश्नाचे उत्तर देताना एखाद्याला डोक्यावर घ्यायचं आणि खाली उतरायचं ही भाजपची जुनीच पद्धतच असल्याची टीकाही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत होईल असे काहीही करणार ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला आघाडीला चहाला बोलावले की त्यांची नाराजी जाईलनिवडणुकीच्या तोंडावर छत्रपती चंद्रकांत खैरे आणि तुमच्यातील वाद तसेच पक्षप्रमुखांना भेटून दिल्यामुळे नाराज झालेले महिला आघाडी याचा पक्षाला फटका बसेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले तिकीट मागणे म्हणजे काही वाद नाही. दुसरीकडे महिला आघाडी यांना सकाळी साडेअकराची वेळ देण्यात आली होती. त्या नऊ वाजता आल्या यामुळे त्यांची भेट झाली नाही. महिला आघाडीला सायंकाळी चहा पिण्यास बोलवले की त्यांची नाराजी दूर होते ,असा दावा आमदार दानवे यांनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद